Ajit Pawar, Farmers | "शेतकऱ्यांवर जलसमाधी घेण्याची वेळ आणू नका"; अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 06:08 PM2022-11-23T18:08:07+5:302022-11-23T18:08:35+5:30

"शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशासाठी कोर्टात जाण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये"

Ajit Pawar slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government for neglecting farmer related issue | Ajit Pawar, Farmers | "शेतकऱ्यांवर जलसमाधी घेण्याची वेळ आणू नका"; अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं

Ajit Pawar, Farmers | "शेतकऱ्यांवर जलसमाधी घेण्याची वेळ आणू नका"; अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं

googlenewsNext

Ajit Pawar, Farmers: शेतकर्‍यांच्या मनात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) - देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारबद्दल फार मोठी नाराजी आहे. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली तर त्यांच्याशी चर्चा करत होतो, मात्र आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही ही भूमिका लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने त्यांना वेळ दिला पाहिजे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला सुनावले.

"ऑक्टोबरमध्ये जो परतीचा पाऊस झाला, त्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी होती तशी मदत मिळताना दिसत नाही. एकतर पीकविम्याचे पैसे इतके तुटपुंजे मिळत आहेत की, शेतकऱ्यांना जी पीक विम्याची रक्कम जो विमा उतरवला आहे तो जवळपास दीड ते दोन हजार रुपयांचा आहे आणि त्यांच्या खात्यात फक्त ७० - ९० रुपये आले आहेत. यासंदर्भात केंद्रसरकारची मदत घेऊन या विमा कंपन्यांना ऐकायला भाग पाडण्यासाठी गरजेचे आहे. यासंदर्भात काही शेतकरी कोर्टात गेले आहेत. शेतकऱ्यांचा पीक विमा राज्यसरकार काढत असते त्याला काही प्रमाणात केंद्रसरकारची मदत होत असते. त्यावेळी शेतकऱ्यांना स्वतः च्या पीक विम्याच्या पैशासाठी कोर्टात जाण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये. सरकारने त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि वेळ पडली तर केंद्रसरकारला हस्तक्षेप करायला सांगितले पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे," अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

"शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीत. तुपकर यांनी मला सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्याचे सांगितले. त्यांची एवढीच इच्छा आहे की या मागण्यांसंदर्भात भूमिका घेतली आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा व बैठक आयोजित करावी अशी मागणी आहे. या संदर्भात आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देणार आहे," अशी माहितीही अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.

"राजू शेट्टी यांनी ऊसासंदर्भात आंदोलन केले. सरकारने लक्ष घातले नाही तर टोकाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा दिला आहे. शेतकरी नेते असो किंवा शेतकऱ्यांच्या संघटना असोत किंवा शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष असो यांच्याकडून शेतकऱ्यांसंदर्भात मागण्या येतात  त्यावेळी अतिशय समंजस भूमिका सरकारने घेतली पाहिजे," असे स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Ajit Pawar slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government for neglecting farmer related issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.