शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या

By admin | Published: March 15, 2015 10:51 PM

तासगावात बैठक : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश

तासगाव : तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्था चांगल्या पध्दतीने चालविल्या गेल्याच पाहिजेत. अन्यथा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही, असे स्पष्ट करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. तासगाव, कवठेमहांकाळच्या पोटनिवडणुकीत आर. आर. आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या विजयासाठी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले. शनिवारी अजित पवार यांनी तासगावात बैठक घेऊन कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावण्याबरोबरच प्रोत्साहितही केले. शनिवारी अजित पवार यांच्यासह आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी तासगावात येऊन कार्यकर्त्यांची स्वतंत्रपणे मते अजमावून घेतली. दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील आबा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी आपली सडेतोड मते व्यक्त केली.सुमारे तासभर सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या भाषणात बारकावा होता. आबांचे व्यक्तिमत्त्व उलगडून सांगत असताना त्यांनी लगावलेले चौकार, षटकार कार्यकर्त्यांना अंतर्मुख करायला लावणारेच आहेत. केवळ तासगाव, सांगली नाही, तर राज्यात सर्वत्र, विशेषत: विधिमंडळात आबांची उणीव पावलोपावली जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यांनी शोकसंदेश पाठवले. हे सर्वसाधारणपणे घडत नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.राज्यातल्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांत सर्वात लोकप्रिय आबाच होते, हे सांगताना त्यांच्या मताधिक्याबाबत पवारांनी उपस्थित केलेला प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. खुद्द आबांनीही यापूर्वी अनेकदा ही बाब बोलून दाखविली होती. नेमके तेच पवार बोलल्याने सभागृहात शांतता पसरली होती. या त्यांच्या विधानाने त्यांना काय म्हणायचे होते, ते कार्यकर्त्यांना चांगलेच कळले.दुसरीकडे तालुक्यातल्या स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था उत्तम चालल्या पाहिजेत अन्यथा राजीनामे घेणार असल्याचे त्यांचे विधान अधिक चर्चिले जात आहे. आबा गटात आबांचाच शब्द अंतिम असायचा. झिडकारणे हा त्यांचा पिंडच नसल्याने त्यांनी समजावून घेणे पसंत केले. याच पार्श्वभूमीवर अजित पवार स्पष्ट बोलले. ‘समजावून घेणे जमत नाही, पहिल्यांदा राजीनामा, मग बाकीचे’, असे सांगून त्यांनी संस्था कायम असते, याची जाणीवही करुन दिली.उमेदवारी अर्ज भरतानाची घ्यायची दक्षता ते निवडणूक प्रक्रियेतील कार्यकर्त्यांची भूमिका, जबाबदाऱ्या इथंपर्यंत त्यांनी उल्लेख केला. तो करीत असताना आबांनी उभे केलेले काम, त्यांचा दृष्टिकोन व उर्वरित कामांसाठी राष्ट्रवादीचे प्रमुख आमदार भविष्यात मतदारसंघासाठी देणार असलेला वेळ, या सर्व विषयांना स्पर्श करून अखेर संघटना मजबूत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)...तरीही आबांचे मताधिक्य कमी का?आर. आर. पाटील यांना ‘राज्याचे लाडके नेते’ असे संबोधले जात होते. अशी लोकप्रिय उपाधी सध्या कुणाही राजकारण्याला नाही. राज्यातल्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांतही सर्वात लोकप्रिय आबाच होते, हे सांगताना आबा सर्वांचेच लाडके, लोकप्रिय नेते होते, त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता, मात्र निवडणुकीमध्ये त्यांचे मताधिक्क्य कमी का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. खुद्द आबांनीही यापूर्वी अनेकदा ही बाब बोलून दाखविली होती. नेमके तेच पवार बोलल्याने सभागृहात शांतता पसरली.