शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय
2
Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
3
कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन
4
कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती?
5
IND vs NZ 1st Test : टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एन्ट्री झाली, पण Sarfaraz Khan च्या पदरी पडला भोपळा
6
"आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?
7
"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात करा तंत्रज्ञानाचा 'स्मार्ट' वापर!
9
तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा
10
पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर
11
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
12
गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप
13
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
14
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
15
३ दिवसांत १३ विमाने उडविण्याच्या धमक्या; केंद्र सरकारकडून उपययोजना सुरू
16
Reliance Bonus Shares : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' दिवशी मिळणार बोनस शेअर्स; एक्सपर्ट बुलिश
17
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
18
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
19
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
20
"२० ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय घेणार"; जरांगे-पाटील आज अर्ज केलेल्या इच्छुकांशी संवाद साधणार

माझ्या जीवात जीव असेपर्यंत...; अजित पवार यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 3:26 PM

मी कुणाचाही अपमान केला नाही. अनेकदा मी माघार घेतली. अनेकदा कमीपणा घेतला असं अजित पवार म्हणाले.

मुंबई – कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला अंतर देणार नाही. मी इथून पुढच्या काळात राज्यभरात फिरेन, माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न करेन. २०२४, २०२९ ची निवडणूक असेल नवीन कार्यकर्ते पुढे आणायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत टीम आपल्याला पुढे आणायची आहे. नुसते भाषणात सांगून नाही तर कृतीत काम करायचा आहे. अजित पवार कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादाला मी निश्चित जागेन अशी साद अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  ४-५ वेळा उपमुख्यमंत्री झालो रेकॉर्ड झाला पण पुढेच जात नाही. मी प्रमुख व्हावे मनापासून वाटते. माझ्या मनात काही गोष्ट आहे त्या गोष्टी राबवावं. पक्ष, चिन्ह आपल्याकडेच ठेवायचा आहे. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आणू. महाराष्ट्र पिंजून काढू. पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरू. आमच्या दैवताने आम्हाला आशीर्वाद द्यावा. मलाही भाषण करता येते. उद्या त्यांनी दौरा सुरू केला तर मलाही उत्तर द्यावे लागेल. माझ्यात खोट नाही. तू निवडून कसा येतो अशी भाषा वरिष्ठांनी करायची. तुमची मुले ना ती, तुम्ही दैवत आमचे. पण असं बोलता. आम्ही जे करतोय ते राज्याच्या भल्यासाठी करतोय. कोट्यवधीचा निधी मतदारसंघाला आणता येईल असं त्यांनी सांगितले.

तसेच मी कुणाचाही अपमान केला नाही. अनेकदा मी माघार घेतली. अनेकदा कमीपणा घेतला. आमच्यावर गुगली टाकली ती सहन केली. सांगितले एक आणि केले दुसरे. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे. आपणच आपल्या कार्यकर्त्यांना घरच्या माणसांना कशापद्धतीने खेळवायचे. बदनाम करायचे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोकांनी मला व्हिलन केले. मला जे सांगितले ते केले. परकीय मुद्दा निघाला ६ महिन्यात बासनात गुंडाळून ठेवले. त्यानंतर त्यांच्यासोबतच आपण आलो असंही अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्याला मंत्रिमंडळात आणखी संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ मंत्रिपदे दिली त्यात ओबीसी, अल्पसंख्याक, महिला सगळ्यांना संधी दिली. आजही माझ्या जीवाभावाचे सहकारी आहेत. महामंडळे आहेत. राज्यमंत्रिपदे मिळणार आहेत. मी रात्रंदिवस काम करेन. भाजपा-शिवसेना आमदारही नाराज होतील अशी कामे करणार नाही. आपल्याही आमदारांनाही न्याय देईन. मागील काही वर्ष आमदारांच्या मतदारसंघात ब्लॅकलॉग पडलाय तो भरून देईन हा शब्द देतो असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

जितेंद्र आव्हाडांना नाव न घेता टोला

ठाण्याचा पट्टा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, सुभाष भोईर, किसन कथोरे, संदीप नाईक, निरंजन डावखरे यासारखे अनेकजण पक्ष सोडून गेले. एका मंत्र्यांनी ४ आमदार निवडून आणले पाहिजे. बेरजेचे राजकारण केले पाहिजे. पण आपले आमदार घालवणाऱ्याला नेता बनवला. काही प्रवक्ते चांगल्याचे वाटोळे करतात. तसले काम ती व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड