शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 8:56 PM

अमित शाह यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी अमित शाह यांनी मुंबईतील दादर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी येत्या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल. मात्र, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर केवळ भाजपच्या ताकदीवर स्वबळाची सत्ता येईल, असं विधान अमित शाह यांनी केले आहे. 

अमित शाह यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यात पोहोचली. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांना अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. १९८५ नंतर जवळपास ४० वर्षे एका पक्षाचं सरकार कधीचं आलं नाही. इतर राज्यांची आणि महाराष्ट्राची परिस्थितीत वेगळी आहे. भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आजच्या परिस्थितीत एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही. कार्यकर्त्यांचं उत्साह वाढवण्यासाठी, त्या हेतून त्यांनी सांगितले असेल. भाजपला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

याचबरोबर, अजित पवार हे तिसऱ्या आघाडीमध्ये जातील असे काहीजणांकडून म्हटले जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मी तिसरा आघाडीचा चेहरा होईल असं सांगितलं जातं. पण हे ऐकून आमची करमणूक होते. आमचे आम्हालाच कळत नाही, आमची ब्रेकिंग न्यूज तिथे चालत असते. तिसरी आघाडी होईल, चौथी देखील होईल. त्यांचे उमेदवारी त्यांनी जाहीर केले आहेत, असे अजित पवार म्हणाले. तसेच, आज माजलगाव आणि परळीत जनसन्मान यात्रेसाठी आलो. जास्तीत मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहे. योजना सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही कुणावरही टीका करत नाही. आम्ही काम करणार आहोत हे आम्ही लोकांना सांगत आहोत, असे देखील अजित पवार म्हणाले.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी जे सरकार काम करतं तेच निवडणूक जिंकतात, आपण केंद्रात सलग तिसरे सरकार बनवले. आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार होईल. त्यासाठी जोमात काम करा. यंदा २०२४ ला महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. २०२९ मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचे आहे. यंदा फक्त ऐका, २०२४ मध्ये युतीचे सरकार असेल. पण २०२९ मध्ये शुद्ध रुपाने कमळचे सरकार असेल, असे मोठे विधान अमित शाह यांनी केले आहे. 

अमित शाहांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचनाकेंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही सूचना दिल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर सक्रिय रहावे, प्रत्येक बूथवर भाजपचे १० कार्यकर्ते असावेत अशा सूचना अमित शाहांनी दिल्या. तसेच शक्य तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना फोडावे आणि भाजपमध्ये सामील करून घ्यावं अशा सूचनाही अमित शाहांनी दिल्या.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुती