शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

अकोला - यावर्षी पावसाने जून, जूलैमध्येच ओलांडली सरासरी

By admin | Published: August 30, 2016 5:51 PM

पश्चिम विदर्भात (व-हाड) पावसाने यावर्षी सरासरी गाठली आहे.मागील चार वर्षांनंतर प्रथमच जून ते ऑगस्ट महिन्यात ११० टक्के पाऊस झाला आहे

- ऑनलाइन लोकमत
 शेतजमीन मात्र भेगाळली 
अकोला, दि. 30 - पश्चिम विदर्भात (व-हाड) पावसाने यावर्षी सरासरी गाठली आहे.मागील चार वर्षांनंतर प्रथमच जून ते ऑगस्ट महिन्यात ११० टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत ६०७.३ पाऊस हवा होता तो ६७०.७ मि.मी पाऊस झाला आहे. मागील २५ दिवसापासून पावसाने दडी  मारल्याने शेतजमीन भेगाळली असून, वातावरण दमटपणा वाढला आहे.
 
जून ते ऑगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत ६०७.३  मि.मी. पाऊस अपेक्षित होता; परंतु ३० ऑगस्टपर्यंत यावर्षी ६७०.७ मि.मी. म्हणजेच ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ११८ टक्के पाऊस अकोला जिल्ह्यात झाला. या जिल्ह्यात ३० ऑगस्टपर्यंत ५३४.४ मि.मी. पाऊस अपेक्षित होता, तो यावर्षी ५५८.५ मि.मी. म्हणजेच ११८ टक्के झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५१३.७ मि.मी. पाऊस हवा होता तो ५५७.० मि.मी. म्हणजेच १०९ टक्के झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ६२५.० मि.मी. पावसाची गरज होती प्रत्यक्षात ७१५.९. म्हणजेच ११५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  अमरावती जिल्ह्यात ६३५.७ मि.मी. पाऊस अपेक्षित होेता; परंतु ७३३.५ मि.मी. ११५ टक्के पाऊस होऊन सरासरी ओलांडली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ७१९.१ मि.मी.पाऊस अपेक्षित होेता. यावर्षी ७०७.७ मि.मी. म्हणजेच ९८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 
 
- यावर्षी विभागात ११० टक्के पाऊस झाला असून, पिके उत्तम आहेत. परंतु मागील पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.पीक परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. आता पावसाची गरज आहे.
- एस.आर. सरदार, विभागीय सहसंचालक, अमरावती.