शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अकोल्याच्या कावड यात्रेत प्रथमच ‘निषेधाची कावड ’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 16:54 IST

देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळवेगळी धार्मिक परंपरा आहे. १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा केवळ धार्मिक उत्सवच नाहीतर तो लोकोत्सव

ऑनलाइन लोकमत
 
अकोला, दि. 29 -  देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळवेगळी धार्मिक परंपरा आहे. १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा केवळ धार्मिक उत्सवच नाहीतर तो लोकोत्सव झाला आहे. यावर्षी मात्र प्रथमच कावड यात्रेत सहभागी जय बाभळेश्वर मंडळाने पुर्णा नदीचे जल दूषित असल्याने राजेश्वराला अर्पण न करता प्रशासनाचा निषेध केला आहे. 
पूर्णेच्या पात्रातील जल दूषित झाले आहे. या जलाने राजराजेश्वराला जलाभिषेक न करता, पावित्र्य जपावे आणि संबंधित कारखाने मालकावर जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळांच्यावतीने सोमवारी पूर्णेचे दूषित जल १00 भरण्यांमध्ये आणून सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास जय हिंद चौकात भरण्यांमधील दूषित जल ओतून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी जय बाभळेश्वर मंडळाचे शिवभक्त हातात फलक घेऊन निषेध करीत होते. श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांच्या आनंदाला उधाण येतं. ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून ५१ ते ५५१ भरणे, भोपळ्यांची कावड तयार करण्यासाठी आठवडाभर तयारीला लागतात. कावडसोबतच पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारतात. यंदाच्या पालखीमध्ये तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे ५५१ भरण्याची, डाबकी रोडवासी शिवभक्त मंडळाची ४५१ भरण्याची कावड यात्रेकरूंचे आकर्षण होती. विविध शिवभक्त मंडळांनी साकारलेले पालखीवरील आकर्षक देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.