शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

आघाडी-युतीची खिचडी!

By admin | Published: March 22, 2017 2:49 AM

राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत कुठे शिवसेना-काँग्रेस, कुठे भाजपा-काँग्रेस तर कुठे शिवसेना-राष्ट्रवादी वा भाजपा-राष्ट्रवादी

मुंबई : राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत कुठे शिवसेना-काँग्रेस, कुठे भाजपा-काँग्रेस तर कुठे शिवसेना-राष्ट्रवादी वा भाजपा-राष्ट्रवादी अशी राजकीय खिचडी शिजल्याने पक्षनिष्ठा आणि तत्वांवर पाणी सोडण्यात आले. सत्तेसाठी राजकीय मतभेदाच्या भिंती ओलांडताना सर्वांनीच सोयीनुसार भूमिका घेतली. त्यामुळे बहुमत हाती असतानाही बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले, तर सोलापुरात सर्वांच्या भांडणात अपक्षांची लॉटरी लागली.नाशिकमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर सेनेचा अध्यक्ष, कोल्हापूर, सांगलीत इतिहास घडवित भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढले. बीडमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले प्रतिस्पर्धी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मात करीत भाजपाकडे अध्यक्षपद खेचून आणले. शिवाय माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची सोबत घेत राष्ट्रवादीलाही सुरुंग लावला. बुलडाण्यात भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता आली तर यवतमाळमध्ये भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले. औरंगाबादमध्ये शिवसेना-काँग्रेस युतीची सत्ता आली. भाजपाला सर्वाधिक जागा असूनही प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या जालन्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-अपक्षांनी एकत्र येत भाजपाला शह दिला. शिवसेनेला केवळ रत्नागिरीत एकहाती सत्ता मिळाली. अन्य चार ठिकाणी ते काँग्रेस, राष्ट्रवादी वा दोघांचीही सोबत त्यांनी घेतली. अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे अध्यक्षपदी निवडून आल्या. उस्मानाबादेत भाजपा व शिवसेनेच्या काही सदस्यांनी मतदानावेळी गैरहजर राहत राष्ट्रवादीचा विजयाचा मार्ग सुकर केला. भाजपा-शिवसेनेतील भांडणात राष्ट्रवादीचे सर्वाधिक नऊ उपाध्यक्ष निवडून आले. बीड जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाने व्यथित झालेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. सर्वाधिक जागा (पान २ वर )रायगडमध्ये अदिती तटकरे अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, तर उपाध्यक्षपदी शेकापचे आस्वाद पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेनेने अध्यक्षपदासाठी स्वाती नवगणे आणि उपाध्यक्षपदासाठी सुरेंद्र म्हात्रे यांचे अर्ज दाखल केले होते. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बहुमतासाठी पुरेसे असल्याने शिवसेनेचा पराभव झाला.