शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

युतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 13:03 IST

२०१४ ची निवडणूक सोडली तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड सलग २५ वर्षे आमदार राहिले आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुका संपताच आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी जगतापांचा मार्ग खडतर असणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मागच्यावेळी युती न झाल्याने भाजप-शिवसेनेच्या मतांमध्ये झालेल्या विभागणीमुळे जगताप यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी युती निश्चित मानली जात असल्याने जगताप यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

नगर शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. कारण, २०१४ ची निवडणूक सोडली तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड सलग २५ वर्षे आमदार राहिले आहेत. मात्र गेल्यावेळी भाजप- शिवसेनेमध्ये युती झाली नसल्याने मंताची झालेली विभागणी जगताप यांच्यासाठी फायदेशीर ठरली आणि राठोड यांचा पराभव झाला.  मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे जगताप यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांना ४९ हजार ३७८ मते पडली होती. तर माजी आमदार राठोड यांना ४६ हजार ६१ मते मिळाली होती. त्यातच भाजपकडून रिंगणात उतरलेले अभय आगरकर यांना ३९ हजार ९१३ मते पडली होती. जर युती झाली असती तर आगरकर यांची मते राठोड यांच्या पदरात पडली असती आणि त्यांचा सहज विजय झाला असता. मात्र युती न झाल्यानेच राठोड यांना पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यावेळी युती होणार असल्याचे निश्चित समजले जात असून, त्यामुळे जगताप यांचा मार्ग खडतर असणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे जर जगताप राष्ट्रवादीतच राहिले तर राठोड यांची उमदेवारी निश्चित समजली जात आहे. तसेच यावेळी पुन्हा जगताप विरोधात राठोड असा सामना पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे.