शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

महिन्यातून दोनच दारुच्या बाटल्यांना परवानगी

By admin | Published: November 18, 2016 6:35 PM

दारू बाळगण्याचा परवाना असलेल्यांना आता महिन्यातून फक्त दोनच बाटल्या बाळगता येतील. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती

आॅनलाइन लोकमत

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) दि. १८- दारू बाळगण्याचा परवाना असलेल्यांना आता महिन्यातून फक्त दोनच बाटल्या बाळगता येतील. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव व्ही.राधा यांनी दिली. अवैध दारू विक्री विरोधातील कायद्याचा मसुदा तयार होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत अनेक सूचना केल्या आहेत. या मसुद्याबाबत चर्चा करण्यासाठी व्ही. राधा शुक्रवारी राळेगणसिध्दीत आल्या होत्या. अण्णा हजारे, व्ही.राधा, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची सुमारे तासभर याप्रश्नी चर्चा झाली. पूर्वी दारू पिणाऱ्या परवानाधारकास महिन्याला दारूच्या बारा बाटल्या बाळगण्याची परवानगी होती. अण्णा हजारे यांनी त्यास आक्षेप घेतला होता. या परवानगीने ग्रामीण भागात घराघरात दारूची दुकाने होतील, अशी भीती अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करून यात बदल करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागाच्या राज्य सचिव व्ही.राधा यांच्यात बैठकही झाली होती. त्यानंतर फक्त दोन बाटल्याच बाळगता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. सचिव व्ही.राधा म्हणाल्या, अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अवैध दारूविक्री विरोधात नवा कायदा करण्यात येत आहे. अण्णांच्या सूचनेनुसार ग्रामसभेला कायद्याने अधिकार देऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येईल. अवैध दारूविरोधात कारवाई करण्याचे अधिकार ग्रामसुरक्षा दलाला देण्यात येणार आहेत. दारूविक्री करणाऱ्यांविरोधात महिलांनी थेट माझ्याकडेच तक्रार करावी. आम्ही तातडीने कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातून राज्यातील व्यसनमुक्ती अभियानाची चळवळराज्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये दारू, तंबाखू, गुटखा विरोधात व्यसनमुक्ती अभियान चळवळ राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ नगर जिल्ह्यातूनच होणार असल्याची माहिती व्ही.राधा यांनी दिली.