शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

आंबेडकर स्मारकाचा वाद चिघळणार!

By admin | Published: January 20, 2017 2:34 AM

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला

नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. खुप संयम पाळला आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला असून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी बैठक आयोजीत केली आहे. ऐरोलीमध्ये आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहळ यांच्या निवासस्थानी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. नवी मुंबईमध्ये धार्मीक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईची माहीती यावेळी आठवले यांना देण्यात आली. अडथळा होत नसलेल्या बुद्धविहारांवरही कारवाई केली जात आहे. महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंबेडकर स्मारकाचे काम सुरू केले आहे. पण जवळपास ८ महिन्यांपासून बांधकाम ठप्प आहे. पालीका सभागृहाने डोमला मार्बल अच्छादन लावण्याचा ठराव मंजूर केला होता. पण आयआयटीने दिलेला अहवाल व आर्थीक बचतीचे कारण देवून मार्बल न लावण्याचा निर्णय घेतला. नागरीकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर व पालिकेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतरही मार्बल न लावण्यावर प्रशासन ठाम असून सर्व काम ठप्प असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आठवले यांनीही बांधकाम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आंबेडकरी जनतेच्या अस्मीतेचा प्रश्न आहे. काम रखडले असेल तर तुम्ही काय करताय. लोकांना एकत्रीत करा व आवाज उठवा असे आवाहनही आठवले यांनी केले आहे. आठवले यांना भेटण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे, महेश खरे, युवराज मोरे, परमेश्वर गायकवाड, विजय कांबळे, शिला बोधडे व २०० ते ३०० पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत आम्ही खुप संयम ठेवला. शासनाने मुंबईतील इंदू मिलमध्ये स्मारकाचे भुमीपुजन केले पण प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही. नवी मुंबईमध्ये महापालिकेने स्मारक उभारण्यास सुरवात केली आहे. काम अंतिम टप्प्यात असताना डोमला मार्बल बसविण्यावरून त्याला आक्षेप घेण्यात आला व काम थांबविले आहे. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.>नवी मुंबईमधील धार्मीक स्थळांवरील कारवाई व रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे रामदास आठवले यांचे लक्ष वेधण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. निवेदन व विनंती करूनही स्मारकाचे काम पुर्ण होत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून त्यामध्ये याविषयी अंतीम निर्णय घेण्यात येईल. - सिद्राम ओहोळजिल्हा अध्यक्ष आरपीआय