शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

‘निवडणुका आल्या की, आंबेडकरांचे स्मारक आठवते’

By admin | Published: February 05, 2017 12:43 AM

निवडणुका आल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आठवते. महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त शिवस्मारकाचे भूमिपूजन सुचते, पण प्रत्यक्षात कोणत्याच घोषणेची

आश्वी (जि.अहमदनगर) : निवडणुका आल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आठवते. महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त शिवस्मारकाचे भूमिपूजन सुचते, पण प्रत्यक्षात कोणत्याच घोषणेची अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शिर्डी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या निझर्णेश्वर येथील प्रचाराप्रसंगी ते म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली. दोन वर्षे दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना किती मदत मिळाली? याची तुलना करा. नोटाबंदीमुळे केंद्र सरकारकडे १६ लाख कोटी रुपये जमा झाले असतील तर, तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी या सरकारने कर्जमाफीचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षांची रोजच जुगलबंदी पाहत आहोत. दोन्ही पक्षांमध्ये तडीपार गुंड व गुन्हेगारांना खुलेआम प्रवेश देणे सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित होत असून राज्य पिछेहाटीवर जात आहे, असे विखे यांनी सांगितले. (वार्ताहर)