शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

राज्यातील आठ लाखांवर शिधापत्रिकांबाबत संदिग्धता! पाच महिन्यांपासून धान्याची उचल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 03:01 IST

क्षेत्रीय स्तरावर तपासणी, या तपासणीअंती या शिधापत्रिकांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल

अनिल गवईबुलडाणा : पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून धान्याची उचल न झालेल्या तब्बल ७.९० लक्ष शिधापत्रिका शासनाच्या रडारवर आहेत. क्षेत्रीय स्तरावर तपासणी होईपर्यंत या शिधापत्रिका धान्य उचलण्यासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहेत.

राज्यात संगणकीकृत केलेल्या शिधापत्रिकांवरील लाभार्थींनी ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या पाच महिन्यांच्या कालावधीत धान्याची उचल केलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील ७ लक्ष ९५ हजार १६८ शिधापत्रिकांची क्षेत्रीय स्तरावर तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

या तपासणीअंती या शिधापत्रिकांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. या शिधापत्रिका संबंधित शिधा वाटप निरीक्षकांच्या लॉगिनमध्ये वळत्या केल्या जातील. त्यानंतर अपात्र, बोगस, अनिच्छुक अशी शिधापत्रिकांची वर्गवारी केली जाईल.पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील ३९ हजार २२७ हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केलेली नाही.यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार १४३, अकोला जिल्ह्यातील १५ हजार ५०१ तर वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५८३ शिधापत्रिकांचा समावेश आहे.

ई-पॉसबाबत साशंकता!n राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमध्ये अनेकदा तांत्रिक अडचण निर्माण होते. लाभार्थींचे ‘थंब’ लागत नाहीत. २-जी नेटवर्कमुळे खोळंबा होतो. त्यामुळे आधार लिंकिंग असतानाही लाभार्थी धान्यापासून वंचित राहतात. त्यामुळे या क्षेत्रीय स्तरावरील तपासणीबाबत नाराजीचा सूर आहे.

मुंबई, ठाणे टॉपवरमुंबई आणि लगतच्या जिल्ह्यातील सर्वाधिक शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केलेली नाही. यामध्ये ठाणे १,१५,९०४, वडाळा ८७,१८२, पालघर ४२,००४, तर नाशिक जिल्ह्यातील ३६,८३७ शिधापत्रिकाधारकांनी गत पाच महिन्यांत धान्याची उचल केलेली नाही.