शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

अमित शाह यांची 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' म्हणत शरद पवारांवर टीका, अजित दादांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 20:14 IST

"या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचे काम कुणी केले असेल, तर शरद पवार ते आपण केले, हे मी डंके की चोट पे सांगतो,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचा सर्वात मोठे सरदार जर कुणी असतील, तर ते शरद पवार आहेत, याबद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही. तुम्ही काय आरोप करत आहात आमच्यावर? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचे काम कुणी केले असेल, तर शरद पवार ते आपण केले, हे मी डंके की चोट पे सांगतो,” अशा शब्दात आज अमित शाह यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. यानंतर आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

अमित शाह यांच्या शरद पवारांवरील टीकेसंदर्भात प्रश्न केला असता अजित पवार म्हणाले, "यासंदर्भात मला काहीही माहीत नाही. मी सकाळपासून पुण्यात पिंप्री-चिंचवडमध्ये आहे. ते नेमके  काय बोलले आहेत? ते ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देईन." दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली.

आणखी कायम म्हणाले अमित शाह? -मराठा आरक्षणावरून शरद पवारांना लक्ष्य करताना शाह म्हणाले, "महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वेगवेगळे संभ्रम पसरवण्यास सुरुवात केली आहे. मी आज शरद पवार यांना विचारू इच्छितो की, आमच्याकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे सर्वजण बोलत आहेत. आता मी एक निरीक्षण नोंदवू इच्छितो, जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं. मात्र जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेवर येतात तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं, असं अमित शाह म्हणाले. 

काँग्रेसवरही निशाणा - यावेळी अमित शाह यांना काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसवाले प्रचंड अपप्रचार करत आहेत. आम्ही गरीब, दलित, आदिवासींचं कल्याण करणार, असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र मी आज हे विचारायला आलो आहे की,   ५८ वर्षांपर्यंत तुमची सत्ता होती. या काळात तुम्ही गरिबांसाठी काय केलं. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं दूर राहिलं. यांनी त्यांचे विचार नष्ट करण्याचं काम केलं. दहा वर्षांमध्ये गरीबांचं कल्याण करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलं आहे, असेही अमित शाह म्हणाले.

आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ ही नरेंद्र मोदींचं सरकार असतानाच दिली गेली -आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिक मांडताना अमित शाह म्हणाले, भाजप आरक्षण संपविणार असा भ्रम पसरवला जात आहे. आम्ही उत्तर देण्यामध्ये संकोच करू लागलो. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. मात्र आज मी सांगू इच्छितो की, आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ ही नरेंद्र मोदींचं पूर्ण बहुमताचं सरकार असतानाच दिली गेली. तसेच आरक्षणाला बळ देण्याचं कामही नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस