शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अजित पवारांच्या टीकेचा वार अन् अमोल कोल्हेंनी काढली बचावासाठी ढाल, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 13:07 IST

अजित पवारांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांनी हा बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

पुणे - Amol Kolhe on Ajit Pawar ( Marathi News ) परिस्थिती बदलली म्हणून खोटे बोलणे माझ्या तत्वात बसत नाही. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली हे खरेच आहे. अजितदादा मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलायला मी फार लहान कार्यकर्ता आहे. ना मी राजकारणातला आहे, ना माझी राजकीय पार्श्वभूमी आहे. ना माझा कारखाना आहे, ना कुठली शिक्षणसंस्था आहे. त्यामुळे अशा मोठ्या नेत्यांनी बोलणे आणि त्यावर मी माझी प्रतिक्रिया देणे हे बातम्यांमध्ये येण्यासाठी मला पटत नाही.मला जी जबाबदारी दिलीय ती पार पाडणे महत्त्वाचे आहे. यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वात शिरूर मतदारसंघाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे दादांबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने प्रतिक्रिया द्यावी हे पटत नाही असं विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. 

अजित पवारांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांनी हा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. पुण्यात अजित पवारांनी माध्यमांशी बोलता कोल्हेंवर टीका केली होती. त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अजितदादांनी अनेक ठिकाणी भाषणात माझे कौतुक केले आहे. कदाचित त्यांना कुणी माहिती दिली असेल ती चुकीची असेल. त्यामुळे गैरसमजातून त्यांनी टीका केली असेल. मी मतदारसंघात काम केले नसते तर कोविडच्या काळात देशात ५ लाख इतके लसीकरण करणारा देशातील एकमेव मतदारसंघ आहे. इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रोजेक्ट शिरूर मतदारसंघात मांडला. शिवसंकल्प सृष्टी प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धाराला चालना मिळाली. ही चालना मिळण्यासाठी कोण कोण कारणीभूत आहे हे समोर ठेवावे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातून आज ३० हजार कोटी प्रकल्प मतदारसंघात येतायेत. जर काहीच कामे मतदारसंघात झाली नसती तर हे काही झालेच नसते असं प्रत्युत्तर कोल्हेंनी दिले आहे. 

तसेच निवडणूक हे केवळ माध्यम असते. आज राजकारणाकडे पाहताना साधन म्हणून पाहिले जाते. निवडणूक हे माध्यम आणि सत्ता हे साधन आहे. सत्ता येते, जाते, पदे येतात जातात आपण काम करणे महत्त्वाचे आहे. आपली तत्वे, मूल्ये, निष्ठा या सगळ्या गोष्टी एका जागी ठेऊन हे काम करणे मला गरजेचे वाटते. त्यानुसार शरद पवारांच्या मार्गदर्शनात मी काम करतोय. अजितदादा फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल कुठलेही विधान करणे मला शोभणार नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही तर्क लावणे मला उचित वाटत नाही असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, विश्वासानं ज्या गोष्टी खासगीत सांगण्यासारख्या असतात त्या खासगी ठेवण्याचा संकेत असतो. मला वाटते की, हा संकेत माझ्याकडून किमान पाळला जावा, कारण आमच्यात जे काही बोलणे खासगीत झाले असेल ते मला चारचौघात बोलणे योग्य वाटत नाही. मग चारचौघात सांगायचे झाले तर सर्वच सांगावे लागते फक्त निवडक सांगता येत नाही. खासगीतील गोष्टी मला सांगता येणार नाहीत.अजितदादा पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी अनेकदा चर्चा होते. त्यामुळे काही दुरावा होईल असं वाटत नाही. राजकारणात अशी विधाने येत असतात. याआधी दादांनी माझ्याबद्दल, कामाबद्दल जे काही बोललेत ते त्याची भाषणे आहेत. कौतुकाची थाप अनेकदा दिलीय. आता ते काही वेगळे बोलत असतील तर मी का रागवावे? अजितदादांनी एक विरोधात वेगळे दिले म्हणून मी त्यांच्याविषयी का बोलावे, रागवावे? अशी सावध भूमिका अमोल कोल्हे यांनी घेतली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShirurशिरुरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार