शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
2
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
3
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
4
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
5
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
6
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
7
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
8
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
9
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
10
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
11
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
12
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
13
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
14
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
15
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
16
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
17
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
18
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
19
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO
20
मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

स्वातंत्र्यसैनिकाच्या रक्ताने माखलेल्या तिरंगी ध्वजाची ८१ वर्षे जुनी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 5:20 AM

१४ ऑगस्ट १९४२ या दिवशी पालघरची सरकारी कचेरी ताब्यात घेण्याची आणि त्यावर भारतीय झेंडा फडकावण्याची रणनीती ठरविण्यात आली.

हितेन नाईकपालघर : ८१ वर्षांपासून रक्ताने माखलेला तिरंगी ध्वज पालघरवासीयांनी केवळ वस्तू म्हणून जपला नाही तर त्यापासून नव्या पिढीला सतत प्रेरणा मिळाली पाहिजे, यासाठी तो ध्वज आणि त्याची कथा तरुण विद्यार्थ्यांसाठी जिवंत ठेवली आहे. ‘दिन खून के हमारे, यारो, न भूल जाना, खुशियोंमें अपनी, हम पें आसू बहाते जाना’, या काव्याच्या पंक्ती गाऊन हजारो पालघरवासीय ताठ मानेने आपली छाती फुगवून हुतात्म्यांना सलामी देत आले आहेत. त्याच झेंड्याची ही अत्यंत रोमहर्षक कथा

१४ ऑगस्ट १९४२ या दिवशी पालघरची सरकारी कचेरी ताब्यात घेण्याची आणि त्यावर भारतीय झेंडा फडकावण्याची रणनीती ठरविण्यात आली. याची चाहूल इंग्रजी सत्ताधाऱ्यांना लागल्यावर इन्स्पेक्टर अल्मिडा व त्यांच्यासोबत चार सशस्त्र शिपायांची तुकडी पालघरमध्ये तैनात करण्यात आली आणि १३ ऑगस्टपासून कचेरी रस्त्याच्या नाक्यावर सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा सुरू झाला. सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे पालघरमध्ये वातावरण तंग बनले. नांदगाव सातपाटी, मुरबे, आलेवाडी, नवापूर आदी भागांतून हजारो सत्याग्रही पालघरच्या दिशेने निघाले. एक मोठा जमाव कचेरीवर तिरंगा फडकावण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा प्रांताधिकारी शेख मोहिद्दिन यांनी लोकांच्या दिशेने हातवारे करून अपशब्द वापरल्याने जमाव चवताळला. याचवेळी पाटीलकीचा राजीनामा देऊन संग्रामात सामील झालेल्या नांदगावच्या चिंतू नाना यांना पाहून ब्रिटिश अधिकारी भडकला. एक सरकारी माणूस मोर्चात पाहून त्यांनी चिंतू नानाच्या दंडाला पकडून शिवी देत जाब विचारला. हे चित्र पाहून नांदगावच्या तरुणांची एक फळी अल्मिडाच्या दिशेने चालून आली. लाठीहल्ला सुरू झाला. अनेक जण रक्तबंबाळ झाले. पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. गोळीबार सुरू झाला. 

त्या गर्दीत नांदगावच्या सेवा दलाचा शाखाप्रमुख गोविंद गणेश ठाकूर या अवघ्या १७ वर्षीय तरुणाने चित्त्याच्या चपळाईने पोलिसांच्या साखळीतून पुढे जात वंदे मातरम् अशी गर्जना करीत हातात ध्वज उंच धरून पुढे मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीत कचेरीवर भारतीय झेंडा फडकावण्याचा  त्याचा निश्चय पोलिसांच्या लाठ्यांनी सुद्धा ढळला नाही. आपल्या हातातला राष्ट्रध्वज काढून घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरवत पोलिसांचा वेढा तोडीत तो पुढे सरकत होता. मात्र अल्मिडा या इंग्रज अधिकाऱ्याने जवळून झाडलेल्या गोळीने या तरुणाचा वेध घेतला. जखमी स्थितीतही त्याने वंदे मातरम्चा जयघोष करत आपल्या हातातला झेंडा खाली पडू दिला नाही. मात्र काही वेळाने तो खाली कोसळल्यावर हौतात्म्य प्राप्त झालेल्या त्या हुतात्म्याच्या रक्ताने हा झेंडा न्हाऊन गेला. गोविंद ठाकूर यांच्या रक्ताचे सिंचन झालेला हा ध्वज नंतर पोलिसांच्या नकळत सेवा दलाचे प्रसन्न नाईक यांनी पळवून आणण्यात यश मिळविले. या घटनेदरम्यान काशिनाथ भाई पागधरे (२६ वर्षे), राम प्रसाद भीमाशंकर तेवारी (१७ वर्षे), रामचंद्र माधव चुरी (२४ वर्षे), सुकुर गोविंद मोरे (२२ वर्षे) या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.

तोच हा झेंडा. त्या झेंड्याचे पावित्र्य राखण्याचे काम पालघरवासीय आजही करीत असून अंगात सळसळणाऱ्या रक्त असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचे बीज रोवण्याचे काम मागील ८१ वर्षांपासून केले जात आहे.  त्या पवित्र झेंड्याचे जतन करण्याचे काम पालघर नगरपरिषद करीत असून तो एका फ्रेममध्ये जपून ठेवण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी पालघर शहरात घटनास्थळाच्या जवळ हुतात्मा स्तंभ येथे १४ ऑगस्टला याच पवित्र झेंड्याचे पूजन केले जाते.