शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
2
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
3
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
4
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
5
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
6
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
7
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
8
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
11
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
12
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
13
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
15
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
16
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
17
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
18
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
19
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
20
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!

अन् सुनेने केली स्वप्नपूर्ती

By admin | Published: November 01, 2014 1:36 AM

आधी जनसंघ, जनता पार्टी आणि आता भाजपा उमेदवाराला यशस्वी करण्याचे तब्बल 4क् वर्षाचे स्वप्न आज विद्या ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना पूर्णत्वाला नेले.

चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा सुधीर मुनगंटीवारांच्या मंत्रिपदाने वाढल्या आहेत. केवळ मतदार संघाचेच नव्हे तर, जिल्ह्याचे रूप त्यांनी पालटावे, अशा अपेक्षा जनतेने व्यक्त केल्या आहेत.‘लोकमत’ने सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा आणि प्रेम जाणवले. मूलमधील भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मोती टहलियानी म्हणाले, मागील पाच वर्षे मंत्री नसताना मूल तालुक्याचा विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावेळी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असल्याने ते क्षेत्राचा विकास साधतील असा आत्मविश्वास आहे. मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गांगरेड्डीवार म्हणाले, तालुक्यात सिंचनाचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. त्यामुळे ह्युुमन प्रकल्प, गोसिखुर्द प्रकल्प मार्गी लावून त्यांनी तालुक्यात सिंचनाची सोय करावी व मूल तालुका सुजलाम सुफलाम करावा.जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंदू मारगोनवार म्हणाले, विकासाचा महामेरु म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांची ख्याती आहे. मंत्री झाल्यावर त्यांची जबाबदारी वाढली असून सर्व सामान्याचा न्याय देण्यासाठी विशेष तत्पर राहतील. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले म्हणाल्या, विकासाची तळमळ व काम करण्याची तत्परता सुधीर मुनगंटीवार यांच्या नसानसात भिनली आहे. त्यामुळे विधानसभेत त्यांना संसदपटू उपाधीने गौरविण्यात आले आहे. मंत्री झाल्याने विकासाला प्राधान्य देतील असा विश्वास आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सामान्य नागरिकांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या. मूल येथील नामदेव काळे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी जात, पक्ष भेद न करता सर्वसामान्य नागरिकांची कामे केली आहेत. त्यांच्या कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून, ते मंत्री झाल्याने गरिबांच्या मागण्यांना न्याय मिळेल. मूल येथील अशोक गावतुरे म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. त्यांनी जातीपलीकडे जाऊन राजकारण केले. त्यामुळे सर्वसामान्यांचे ते लाडके आहेत.मूल येथील कमलाकर नवघडे म्हणाले, सर्वसामान्यांचा नेता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे. ते सर्व सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत आले. पुढेही ते सर्वसामान्यांच्या प्रश्नाला प्रथम स्थान देतील. मूल येथील मोती टहलियानी म्हणाले, पाच वर्षे मंत्री नसतानासुध्दा त्यांनी मूल तालुक्याच्या विकासाठी प्रयत्न केलेत. ते मंत्री झाल्याने तालुक्यातील विकास कामांना गती मिळणार आहे. चंद्रपूर येथील माणिक नरडे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील नेते असल्याने त्यांना विदर्भातील समस्यांची चांगली जाण आहे. सिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांच्या मंत्री होण्यामुळे सुटण्याची आशा आहे. प्रविण इटनकर म्हणाले, जिल्ह्यातील नेत्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याचे वजन वाढले आहे. गोरगरिबांच्या समस्या शासनस्तरावर जाऊन त्यांचा तत्काळ निपटारा होईल. प्रमोद विश्वकर्मा म्हणाले, जिल्ह्यात प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. तर गुन्हेगारीनेही तोंड वर केले आहे. मंत्री पद जिल्ह्याला मिळाल्याने प्रदूषण व गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी आशा आहे. भाजपाचे बल्लारपूर येथील ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल म्हणाले, आज आमच्यासाठी निश्चितच सोनियाचा दिन ठरलाय. मुनगंटीवार हे दिलेली आश्वासन नक्कीच पूर्ण करतील, असा ठाम विश्वास आहे.