शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

अण्णा हजारे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे हस्तक - शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी

By admin | Published: June 02, 2017 5:36 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 2 -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी  संपाला पाठिंबा दर्शवला आहे.  मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.  
 
 शेतकरी संपाला अण्णा हजारे यांच्या पाठिंब्याची गरज नाही. ते आंदोलनादरम्यान आणि आंदोलनानंतर जराही फिरकले नाहीत. आता आंदोलन एका मोठ्या वळणावर आले असता ते मध्यस्थी करत आहेत. पण त्यांनी किसान क्रांतीच्या सदस्यांना मध्यस्थी करताना विचारले आहे का?, असाही प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. 
 
खरं तर राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना ते एका आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत.  खरं तर अण्णा हजारे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला आहे.  
 
""अण्णांनी आमची वकिली करू नये. आम्ही शेतकरी आमची वकिली करण्यास समर्थ आहोत,  असेही जयाजीराव सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.  
 
 
""शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खासगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
 
जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे.
 
अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे"", असे सांगत अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शनला आहे.  मात्र अण्णांचा पाठिंबा नको असल्याचे शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.