शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

संघटन उभे न केल्याची अण्णांच्या मनाला सल

By admin | Published: March 16, 2015 2:26 AM

अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते,

पुणे : अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते, तर त्याचा फायदा समाजहितासाठी झाला असता, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी व्यक्त केली. भूसंपादन विधेयकाविरोधातील हजारे यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचा समारोप महात्मा गांधी भवन येथे रविवारी झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह अण्णा हजारे उपस्थित होते. यावेळी शेतकरी हिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले.केंद्रातील यापूर्वीचे सरकार किमान पत्राला उत्तरे देत होते. मात्र, केंद्रातील भाजपा सरकारबरोबर भूसंपादन कायद्यात बदल करण्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जनजागृतीसाठी वर्धा सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे हजारे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून दंडुकशाही आणि षड्यंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज घेऊनच आंदोलन सुरू करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्याविरोधात हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा राहणार आहे, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केली. माजी कृषी पणन संचालक डॉ. सुभाष माने, समाजसेविका वर्षा काळे, उद्योजक कैलास वाणी यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, सरकार चुकेल, त्यावेळी विरोध करणे हा आमचा नैतिक अधिकार आहे. सत्तेत असलो आणि नसलो तरी काही फरक पडणार नाही. आम्ही स्वत:हून महायुतीतून बाहेर पडणार नाही, पण आम्हाला सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असेही शेट्टी म्हणाले.