शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

अणेंचा राजीनामा

By admin | Published: March 23, 2016 4:31 AM

विदर्भासोबत मराठवाडाही वेगळा करायला हवा, असे वक्तव्य करून राजकीय पक्षांच्या टीकेचे धनी बनलेले श्रीहरी अणे यांनी अखेर महाधिवक्ता पदाचा राजीनामा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द केला

मुंबई : विदर्भासोबत मराठवाडाही वेगळा करायला हवा, असे वक्तव्य करून राजकीय पक्षांच्या टीकेचे धनी बनलेले श्रीहरी अणे यांनी अखेर महाधिवक्ता पदाचा राजीनामा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द केला. राज्यपालांनी तो मंजूर केला. अणेंच्या राजीनाम्यामुळे राज्यात उठलेले राजकीय वादंग थंडावले आहे.अपेक्षेनुसार अणे यांनी सोमवारी सकाळी १०.३० सुमारास राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. सकाळी ११ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांसह शिवसेनेच्या सदस्यांनी अणे यांच्यावर कारवाईची मागणी करीत घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला का, अशी विचारणा केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाधिवक्त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा द्यावा, अशी कायदेविषयक तरतूद आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपाल घेतात. राज्यपालांकडे राजीनामा सोपविल्यानंंतर तो ते स्वीकारतात किंवा मंत्रिमंंडळाचे मत मागवितात. राज्यपालांनी मंत्रिमंडळाला अशी विचारणा केली तर राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी शिफारस मंत्रिमंडळ करेल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशानंतर अणेंवरून उठलेले राजकीय वादळ शांत झाले. चौभाजन करा - मा.गो. वैद्यमहाराष्ट्राची एक-दोन नव्हे, तर चार तुकडे पाडा आणि चार नव्या राज्यांची निर्मिती करा, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. ते म्हणाले, संघाच्या परिभाषेत महाराष्ट्राचे चार प्रांत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि देवगिरी अर्थात मराठवाडा-खान्देश अशी संघाने महाराष्ट्राची विभागणी पूर्वीच केली आहे. हे चार प्रांतच स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात यावेत, अशी वैद्य यांची मागणी आहे. > मी सरकारचा नव्हे लोकांचा वकील होतोवेगळ्या विदर्भाची वारंवार मागणी करत वेगळ्या मराठवाड्याचीही कल्पना मांडून टीकेचे धनी झालेल्या राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना मी राज्य सरकारची बाजू मांडणारा नसून, लोकांची बाजू मांडणारा होतो, असे स्पष्ट करत विधिमंडळाचे कामकाज ठप्प करणाऱ्या आमदारांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. आमदारांनी कामकाज ठप्प पाडण्यापेक्षा समस्या सोडविण्याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांमध्ये आमदारांवर त्यांनी टीका केली आहे.महाधिवक्ता आता कोण?श्रीहरी अणे यांनी राजीनाम्यानंतर आता महाधिवक्ता पदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ राम आपटे, अ‍ॅड. अनिल साखरे, अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी आणि अ‍ॅड. मिलिंद साठे यांच्या नावांची चर्चा असल्याचे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. अ‍ॅड. आपटे हे रा.स्व. संघाच्या जवळचे मानले जातात. त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब आपटे हे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी आणि अनिल साखरे यांनी सरकारच्या मोठ्या केसेस लढल्या आहेत. शिवाय, अल्प काळासाठी त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणूनही कामकाज पाहिले आहे. हे तर संघाचे डावपेच - राज ठाकरेराज्य तोडण्याचे काम अणेंपेक्षा रा.स्व. संघ आणि भाजपाच अधिक करीत आहेत. हे मनसुबे त्यांच्याच मनातील आहेत. अणे यांचा बोलविता धनी संघ-भाजपाच आहे. छोट्या राज्यांची कल्पना संघाची आहे. भाजपा तीच पुढे नेत आहे. त्यातही अणे नागपूरचे असून त्यांच्या मनात नसतानाही त्यांना महाधिवक्ता पदावर बसविण्यात आले होते. संघाला अपेक्षित काम त्यांनी केले आणि आता राजीनामा देऊन मोकळे झाले. - राज ठाकरे, मनसेप्रमुख> अखेर सरकारची डोकेदुखी टळली...जालना येथे रविवारी मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या एका कार्यक्रमात बोलताना महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासोबतच मराठवाड्याचेही वेगळे राज्य करण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. अणे यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले होते. विरोधकांसह शिवसेनेने अणे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सरकारची कोंडी झाली होती. शिवसेनेने तर अणे यांचा राजीनामा होईपर्यंत मंत्री बैठकांना जाणार नाहीत, असा इशारा दिला होता. अणे यांना महाधिवक्ता या पदावरून दूर करावे, असे ठराव राष्ट्रवादी व शिवसेनेकडून मांडण्यात आले होते. अणे यांच्या राजीनाम्याबाबत काही निर्णय न झाल्यास या ठरावावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांसोबत शिवसेनेकडूनही केली जाणार होती. तसे झाले असते तर सरकारची अडचण आणखीनच वाढली असती. मात्र, अणे यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याने सरकारची डोकेदुखी टळली.