शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

कोकणासाठी आणखी ६० फेऱ्या

By admin | Published: July 14, 2017 5:19 AM

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी ६० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी ६० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी गणेश उत्सव काळात कोकण मार्गावर १४२ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे यंदा गणेश उत्सवात एकूण २०२ रेल्वेच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.पनवेल ते सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावर नव्याने घोषित केलेल्या ६० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ०११८९-०११९० पनवेल-सावंतवाडी विशेष (८ फेऱ्या) ट्रेन १९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शनिवारी सकाळी ८ वाजता सावंतवाडीहून सुटलेली ट्रेन पनवेलला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.०११९१-०११९२ पनवेल-सावंतवाडी विशेष (८ फेऱ्या) ट्रेन २० आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शनिवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटलेली ट्रेन पनवेलला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. ०१०४३-०१०४ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन (८ फेऱ्या) १८ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटलेली ट्रेन एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.०१०४५-०१०४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन (६ फेऱ्या) २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दर सोमवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार असून, करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटलेली ट्रेन एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. ०११७९-०११८० मुंबई-चिपळूण स्पेशल ट्रेन (२२ फेऱ्या) २० आॅगस्ट ते १२ सप्टेंबरदरम्यान मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी पहाटे ५ वाजता सुटणार असून, चिपळूणला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी मंगळवार, गुरुवार आणि रविवारी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटलेली ट्रेन मुंबईला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. याशिवाय पुणे- सावंतवाडीदरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबई सेंट्रल, वांद्रे येथून सुटणार प.रे.च्या ट्रेनमध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेनेदेखील गणेशोत्सवासाठी विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.ट्रेन क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल-मंगलोर, ट्रेन क्रमांक ०९००९ वांद्रे टर्मिनस-करमाळी एक्स्प्रेस, ०९००७ मुंबई सेंट्रल-मडगाव या विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. अहमदाबाद ते करमाळी या मार्गावर १० विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गणपती विशेष एक्स्प्रेस-ट्रेनची बुकिंग १५ जुलैपासून सुरू होणार आहे.