शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

पावसाच्या विश्रांतीने चिंता; ३२९ गावांना टँकरचा आधार; ‘रिमझिम’ने तूर्तास दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:02 PM

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस? पाहा आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात आजघडीला सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी याचवेळी सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे राज्यासमोरील चिंता वाढली असून काही भागात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे सध्या राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

पावसाच्या विश्रांतीमुळे राज्य सरकारनेही नियोजनास सुरुवात केली आहे. यामध्ये विशेषतः पिण्याचे पाणी तसेच गुरांसाठी चाऱ्याचे नियोजन ठेवण्याच्या सूचना कृषी आणि महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. राज्यात ११३.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

१००% पेक्षा जास्त - ६ जिल्हे - ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नांदेड, यवतमाळ.

७५ ते १००% - १३ जिल्हे - रत्नागिरी, जळगाव, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

५० ते ७५%  - १५ जिल्हे - नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती.

२५ ते ५०% - राज्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत केवळ २५ ते ५० टक्के पाऊस

पिके तरली; पण प्रतीक्षा कायम

पुणे: दीर्घ खंडानंतर तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने बहुतांश पिकांना जीवनदान मिळाले आहे. असे असले तरी धरणांच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ होणार नाही अशीच चिन्हे आहेत. अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.  

दडीनंतर आता तडाखा

नागपूर : दाेन आठवड्यांच्या दडीनंतर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. शनिवारी रात्री पूर्व विदर्भातील वर्धा, गडचिराेली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा जाेरदार फटका बसला. या पावसामुळे अनेक भागांतील शेत शिवारात पाणी साचले असून पिकांची नासाडी झाली आहे. काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊस