शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘दशक्रिया’विरोधातील याचिका फेटाळली, चित्रपट राज्यभर प्रदर्शित; ब्राह्मण महासंघाची ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:30 IST

‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली.

औरंगाबाद/कोल्हापूर/नाशिक/पुणे : ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली. राज्यात ब्राह्मण महासंघांनी चित्रपटाला विरोध करत आंदोलन केले, मात्र पोलीस बंदोबस्तात चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला.सर्जनशील व्यक्तीला नाटक, चित्रपट आदींच्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावरील लघुपटाच्या बंदीविरोधातील याचिकेवरील निर्णयात म्हटल्याचा संदर्भ देत, न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला. बोलणे आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे अटळ आहे. चित्रपट, नाटक, पुस्तक, लघुपट यावर बंदीच्या आदेशापूर्वी न्यायालयाने त्याबाबत साक्षेप बाळगावा. ज्यामुळे लेखक, कलाकार, निर्माते अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपू शकतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचा आधार घेत खंडपीठाने ही याचिका फेटाळली.‘दशक्रिया’ चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे, संदर्भहीन असल्याचा आक्षेप घेणारी आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी आदींची याचिका शुक्रवारी सुनावणीस आली होती.मराठा महासंघाच्या पुढाकाराने प्रदर्शनकोल्हापुरला अखिल भारतीय मराठा महासंघाने चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन चित्रपटाचे खेळ सुरू करायला लावले. चित्रपटाकडे प्रबोधनाचे माध्यम म्हणून बघावे, अशी भूमिका महासंघाने मांडली.पुणे, नाशिकमध्ये आंदोलनपुणे, नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघांनी चित्रपटाला विरोध केला. ब्राम्हण समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते.पैठणमध्ये दशक्रिया विधीत अडथळे -पैठणमध्ये शुक्रवारी मोक्षघाटावर विधी करण्यासाठी पुरोहित हजर राहिले नव्हते. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजातर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. दुपारी १२ नंतर विधी सुरू झाले. राज्यभर या चित्रपटाला विरोध झाला तरी काही ठिकाणी चित्रपट सुरळीत सुरू झाला़ तसेच चित्रपट परीक्षकांनी दर्जेदार सिनेमा असे कौतुक केले आहे़