शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेसची मर्जी राखूनच मनसेला सोबत घेऊ! - धनंजय मुंडे

By राजा माने | Updated: February 14, 2019 02:52 IST

भाजप विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र यावेच लागणार आहे. काही मुद्यांमुळे अशोक चव्हाण यांना मनसे अडचणीची वाटत असली तरी, आम्ही काँग्रेसची मर्जी राखूनच राज ठाकरेंना महाआघाडी सोबत घेऊ, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘लोकमतह्ण दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

मुंबई: भाजप विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र यावेच लागणार आहे. काही मुद्यांमुळे अशोक चव्हाण यांना मनसे अडचणीची वाटत असली तरी, आम्ही काँग्रेसची मर्जी राखूनच राज ठाकरेंना महाआघाडी सोबत घेऊ, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘लोकमतह्ण दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.महाआघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेसचा विरोध असताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारले असता मुंडे म्हणाले, पवार यांनी व्यक्त केलेली भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे.पण भाजप विरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी काँग्रेसची मर्जी राखून मनसेला सोबत घ्यावे लागेल. राष्टÑवादीकडील हातकणंगले ही जागा आम्ही राजू शेट्टी यांना देत आहोत. याच पद्धतीने काँग्रेसही आपल्या वाट्याची एक जागा त्यांना देईल.माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेला मतदारसंघ आहे. शरद पवार याआधीही या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेत. आजही या मतदारसंघात अनेक प्रबळ उमेदवार आमच्याकडे आहेत. परंतु, शरद पवारांनी निवडणूक लढवल्यास राज्यातील १५ टक्के मते स्विंग होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल, असा दावाही मुंडे यांनी केला.ही तर घराणेशाही !बीड जिल्ह्याचे राजकारण म्हणजे एकाच घरात सत्ता. एक बहीण आमदार, एक बहिण खासदार, तर एक बहीण पालकमंत्री! जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्याकडे असताना तुम्ही काय केलं? आजही आमच्या बीड जिल्ह्यावरील ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा कलंक आम्ही पुसू शकलो नाहीत. एक सिंचनाचा नवीन प्रकल्प यांनी सुरू केला का, जलयुक्त केले तेही फक्त कार्यकर्ते पोसायला, अशी टीकाही धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९