शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

‘’लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का?’’, भाजपाचा ठाकरे गटाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 3:04 PM

Ashish Shelar Criticize Shiv Sena UBT: विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईतील इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी ५० टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. त्यावरून आता मुंबईतील राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईतील इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी ५० टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. त्यावरून आता मुंबईतील राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. दरम्यान, अनिल परब यांनी केलेल्या मागणीवरून भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. 

अनिल परब यांनी केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी विचारले की, आघाडीचे सरकार असताना तब्बल ५० टक्के प्रीमियम बिल्डरांना माफ केलात, तेव्हा मराठी माणसाला ५० टक्के घरे राखीव ठेवा, असे  का सांगितले नाही? पत्रा चाळीतील मराठी माणसाच्या घरांमध्ये कट कमिशन खाल्ले, तेव्हा मराठी माणसांची तुम्हाला आठवण झाली नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला. 

या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत होतात, तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलेत? लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का? मराठी माणसाला ५० टक्क्यांचे आरक्षण मागायचे आणि उरलेल्या मध्ये "हिरव्यांना" घुसवायचे? असे तर नाही ना? अशी शंकाही आशिष शेलार यांनी उपस्थित केली. 

भाजपाने गिरणी कामगारांना घरे दिली, बीडीडी चाळीतील मराठी माणसाची हक्काची घरे उभी राहिली! नुसते भावनेचे घोडे कागदावर नाचवायचे आणि मराठी माणसाला वर्षानुवर्षे फसवायचे, अशा शब्दात आशिष शेलार यांनी अनिल परब यांनी केलेल्या मागणीची खिल्ली उडवली. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारAnil Parabअनिल परबBJPभाजपाMumbaiमुंबई