शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Rajya Sabha Election 2022: “संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने, भाजपचा उमेदवार जिंकणारच”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 9:06 AM

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजयचा पराभूत होणार असून, भाजप निश्चित विजयी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई: राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) रिक्त झालेल्या जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. मात्र, यावरून आता देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, दान नेमके कोणाच्या पदरात पडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच भाजपने पुन्हा एकदा घोडेबाजाराच्या आरोपांवरून संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने करत असल्याची टीका भाजपने केली आहे. 

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष बैठक मुंबईतील कार्यालयात पार पडली. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय वाणिज्यमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार पीयूष गोयल, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले.

संजय राऊतांना पराभव दिसतोय

राज्यसभा निवडणुकीची पूर्ण आणि पूर्व तयारी झाली असून सर्व रणनीती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार आहे. भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणारच आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच. रोज सकाळी उठून बोलणाऱ्या संजय राऊत यांचे बोलणे हे बालीश आणि पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्वपक्षाचा पराभव दिसत असेल. त्यामुळे ते असे बोलत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. पराभव दिसत असल्यानेच राऊत यांनी आतापासून कारणांची पेरणी करण्याचे काम सुरू केले आहे. राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. 

स्वपक्षीय आमदारांना नजरकैदेत ठेवले जाते

पक्षाच्या आमदारांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ महाविकास आघाडीवर का आली? आमदारांवर विश्वास नसल्याचं चित्र समोर येते. स्वपक्षीय आमदारांना नजरकैदेत ठेवले जाते. कुठल्या केंद्रीय यंत्रणेचा उपयोग या निवडणुकीत होतोय याचा पुरावा त्यांच्याकडे नाही, असे आशिष शेलार म्हणाले. तसेच कोल्हापूरातील आमदार सतेज पाटलांनी सांभाळले तरी पुरेसे आहेत. दुसऱ्यावर दोष देण्याआधी स्वत:च्या आमदारांना नजरकैदेत ठेवावे लागते. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप करणारे लोकशाहीवर बोलतात. आजपर्यंत कुठल्याही पक्षाने आमदारांचा इतका अपमान केला नाही. शिवसेनेचे आमदार उघड बोलत आहेत, असेही आशिष शेलार म्हणाले. 

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडे २, शिवसेना १, काँग्रेस १, राष्ट्रवादी १ असे उमेदवार निवडून येण्याइतपत संख्याबळ आहे. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. यात भाजपाकडे जादाची ३० मते असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर शिवसेनेनेही आपला उमेदवार निवडून येईल इतके संख्याबळ आहे असं सांगितले आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी चुरशीची लढाई आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAshish Shelarआशीष शेलारSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी