शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

MahaVikas Aghadi: “काँग्रेसचा वाटा मोठा, आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे”: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:00 PM

आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे, हे मुद्दाम सांगितले पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

जालना:महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद अधूनमधून चव्हाट्यावर येत असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून काही ना काही कुरबुरी समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवीन वाद पेटण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा वाटा मोठा आहे. आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे, असा पुनरुच्चार अशोक चव्हाण यांनी केला आहे. 

जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते. एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे, हीच आमची प्रमाणिक भूमिका आहे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला

लोकांचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा

ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयान जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा झाली. भाजपला देशातील, राज्यातील आरक्षण संपून टाकायचे आहे. त्यामुळेच भाजप असहकार्याची भूमिका दाखवत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारने योग्य भूमिका घेतली नाही. केंद्र सरकारने ५० टक्क्यांची अट न काढता अधिकार राज्यांना दिले. त्यांनी कायद्यात बदल केला नाही. संसदेत कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असता. मात्र, केंद्र सरकारला ५० टक्क्यांच्या वर आरक्षण द्यायचेच नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस