शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

एसीबीमार्फत भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा

By admin | Published: July 22, 2016 4:13 AM

राज्यातील डझनभर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना क्लीन चिट दिली

मुंबई : राज्यातील डझनभर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे. विरोधकांनी पुराव्यानिशी मंत्र्यांवर आरोप केले आहेत. गैरव्यवहारांची कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे या सर्व मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंडप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जो नियम लावला, तो अन्य भ्रष्ट मंत्र्यांना का लावला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. विविध विभागातील घोटाळ्यांच्या मुद्यावर विरोधकांनी नियम २६० अन्वये चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला सुरुवात करताना मुंडे म्हणाले की, न खाऊंगा, न खाने दुँगा असे म्हणत सत्तेवर आलेल्यांच्या घोटाळ्यांवर प्रत्येक अधिवेशनात बोलावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. चिक्की घोटाळ्यात वर्षभरापूर्वी पुरावे दिले, सातत्याने पत्रव्यवहार करुनही चौकशी करणे तर दूरच, पत्राची साधी पोच देण्याचे सौजन्यही सरकारने दाखवले नाही. कारवाई न करता क्लिनचिट दिली जात असेल तर, समिती तरी कशाला नेमली ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘नमामी चंद्रभागा’ या योजनेसारखी मंत्रिमंडळाला शुद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन शुद्धीकरणाची मोहिम हाती घ्यावी, असा चिमटाही मुंडे यांनी काढला. केंद्र सरकारने फटकारले, तरी शालेय शिक्षण विभागातील खरेदीची चौकशी करण्यात आली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागातील २९७ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे कोणता थांगपत्ताच नाही. तर डाळ घोटाळ्याचे कवित्व यावषीही सुरु असून बाजारात ९० रुपये किलोने मिळत असलेली डाळ रेशन दुकानावर १२० रुपये किलोने विकण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, असा सवाल मुंडे यांनी केला. आदिवासी विभागात दर अधिवेशनाला नवीन घोटाळा समोर येत आहे, असे मुंडे म्हणाले.>भ्रष्ट मंत्री लगे रहो!मुख्यमंत्र्यांनी कालच सभागृहात एकाही मंत्र्यांवर कारवाई करणार नाही, असे वक्तव्य करुन भ्रष्ट मंत्र्यांना लगे रहोचा संदेश दिला आहे. सरकारमध्ये सहभागी असणारे शिवसेनेचे मंत्रीही भ्रष्टाचारात मागे नाहीत. मराठी माणसाचे नाव घेत मराठी माणसाला देशोधडीला लावले आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर हे स्वत: एसआरएचा भ्रष्टाचार आणि आरे येथे बेकायदेशीररित्या जमीन बळकावल्याच्या आरोपात गुंतले आहेत. एसआरए हे आता भ्रष्टाचाराचे दुकान नव्हे तर मॉल बनले आहे. मंत्रीच जर कॉन्ट्रॅक्टर झाले तर जनतेने कुणाकडे पाहावे, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.