शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

By admin | Published: April 09, 2017 4:02 AM

महाविद्यालयांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता न केल्यास त्यांना प्रतिबंध करण्याचा अधिकार बार कौन्सिल आॅफ इंडियाला (बीसीआय) आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.

मुंबई : महाविद्यालयांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता न केल्यास त्यांना प्रतिबंध करण्याचा अधिकार बार कौन्सिल आॅफ इंडियाला (बीसीआय) आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. राज्यातील ६० विधी महाविद्यालयांना प्रतिबंध करण्याच्या बीसीआयच्या निर्णयाला एलएलबीच्या सात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बीसीआयने मनमानीपणे पहिल्या वर्षाचा प्रवेश बंद केला आहे, असे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटले आहे.‘नियमांना अनुसरून विधी महाविद्यालय चालवण्यात येत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी दरवर्षी बीसीआयकडे दीड लाख रुपये जमा करण्यात येतात. मात्र, बीसीआयने कधीच तपासणी केली नाही. पाहणी न करताच बीसीआयने ६४ महाविद्यालयांमध्ये पुरेसे प्राध्यापक नाहीत किंवा प्राध्यापकांकडे पुरेसे शिक्षण नाही, असे कारण देत त्यांना प्रतिबंध केला आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे.‘बीसीआयला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? हे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करावे. यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि प्रवेश प्रक्रियेसही विलंब होत आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत १३ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ६४ विधी महाविद्यालयांना प्रतिबंध करण्याचा बीसीआयचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)