शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 13:38 IST

Assembly Election Result 2021: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, बंगालमधील झटक्यामुळे आता भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देभाजपच्या मिशन महाराष्ट्रासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चापश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पदरात मोठी निराशाभाजप नेत्यांचा दावा फोल ठरण्याची शक्यता

मुंबई: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सर्वांच्या नजरा मात्र पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागलेले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, तृणमूल काँग्रेसचा विजय जवळपास आता निश्चित मानला जात आहे. यातच आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, बंगालमधील झटक्यामुळे आता भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. (assembly election result 2021 after loss in west bengal will bjp mission maharashtra fail)

आता केवळ २ मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालमधील निकाल समोर आल्यानंतर, महाराष्ट्रातही सत्तांतर होऊ शकते, अशी शक्यता काही भाजप नेत्यांनी वर्तवली होती. मात्र, बंगाल निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठं अपयश येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भाजपचे मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, २ मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता.

फडणवीस यांचेही संकेत

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

शरद पवार आणि अमित शहांची भेट

मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुजरातच्या अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. ही गुप्त भेट असली, तरी त्यासंदर्भातील माहिती समोर आली.  या भेटीनंतर बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा दावा केला जात होता. यावर, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली होती. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, निवडणुकांचे जवळपास सर्व कल हाती आल्यावर भाजपच्या पदरात मोठी निराशा पडल्याचे पाहायला मिळत आहे. बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकीय वर्तुळातील तज्ज्ञ मात्र सत्तांतराचा दावा फेटाळत असून, कोरोनाची परिस्थिती ही त्यामागील मेख असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण