शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Assembly Elections Results 2019: दानवेंनी मदत करूनही खोतकरांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 22:26 IST

लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचे काम केले.

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात चांगलीच गट्टी जमली होती. लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून दानवे देखील खोतकरांसाठी जालन्यात विधानसभा निवडणुकीत ताकद लावताना पाहायला मिळाले होते. मात्र दानवेंची मदत मिळूनही खोतकरां ना आपला गड कायम राखता आला नाही.

जालना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल २५३४८ मतांनी पराभूत केले आहे. खोतकर यांच्याकडे राज्यमंत्री पद असल्याने आणि ग्रामीण भागात वाढता संपर्क असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, मागच्या पराभवाने खचून न जाता गोरंट्याल यांनी मतदारसंघाची बांधणी केली. तसेच त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याने जालना शहरातील व्यापारी वर्ग त्यांच्याकडे वळला. त्यामुळे याचा फटका खोतकर यांना बसल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोतकर आणि दानवे यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले होते. त्यावेळी दानवे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत दोघांची समेट घडवून आणली. त्यानंतर खोतकर यांनी दानवेंसाठी जालना जिल्हा पिंजून काढला आणि दानवेंचा सहज विजय झाला.

लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचे काम केले. त्यांच्या प्रचारार्थ विविध सभा आणि बैठका सुद्धा घेतल्या. मात्र एवढे करूनही खोतकर यांना विजय मिळवता आला नाही. तर त्यांचा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी २५३४८ मतांनी पराभूत केले. अर्जून खोतकर यांना ६६४९७ मते मिळाली तर कैलास गोरंट्याल यांना निर्णायक ९१८३५ मते मिळाली आहे.