शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Assembly Elections Results 2019: हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा पाठींबा भोवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 14:02 IST

हर्षवर्धन जाधव २००९ पासून सलग दोन वेळा कन्नड मतदारसंघातून निवडणून आले आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालानंतर चर्चेत असलेल्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरणारे व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा सुद्धा विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून पराभव झाला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात जातीयसमीकरणाचे चित्र फिरले आणि हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा मिळालेला पाठींबाचं त्यांना भोवला. त्यामुळे जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

हर्षवर्धन जाधव २००९ पासून सलग दोन वेळा कन्नड मतदारसंघातून निवडणून आले आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी आपले नशीब आजमावून पाहिले. तर याच निवडणुकीत मराठा फॅक्टरमुळे जाधवांनी दोन लाखाहून अधिक मते घेतली होती.यामुळे मतांचे विभाजन होऊन चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला व एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. जाधव यांच्यामुळेच जलील निवडून आल्याचे आरोप त्यांनतर शिवसेनेकडून करण्यात आले होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्यात जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधान आणि एमआयएमनी दिलेला खुला पाठींब्यानंतर कन्नड मतदारसंघातील राजकरण तापल्याचे पाहायला मिळाले होते. मतदानाच्या दिवशी कन्नड शहरातील मुस्लीम मतदार जाधवांना एकतर्फी मतदान करत असल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर, इतर मतदार बिथरल्याने आपसुकच 'ती' मते उदयसिंह राजपूत यांच्या पारड्यात गेली.

ऐनवेळी दिलेल्या एमआयएमच्या पाठिंब्याने कन्नड मतदारसंघातील जातीयसमीकरणांना महत्व आले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जाधवांच्या सोबत असलेला मराठा फॅक्टर यावेळी शिवसेनेच्या सोबत उभा राहिला. त्यातच उद्धव ठाकरेंबद्दल कलेल्या विधानामुळे जाधवांना पाडण्यासाठी शिवसेनेकडूनही मोठ्याप्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे सलग दोन वेळा निवडून आलेल्या हर्षवर्धन जाधवांना हॅटट्रिक करता आली नाही.