शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

विधानसभेला होणार लोकसभेची पुनरावृत्ती; वंचित-काँग्रेस युती फिसकटण्याची चिन्हे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 18:23 IST

लोकसभा निवडणुकीत जागावाटपच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाआघाडीत सामील झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे २ महिने शिल्लक राहिले असताना, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाच्या मुद्यावर अजूनही तोडगा निघू शकला नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा अटोकाट प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेली ४० जागांची ऑफर आणि वंचितच्या अटींमुळे ही युती फिसकटण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत जागावाटपच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाआघाडीत सामील झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. विधानसभा निवडणुकीत वंचितला महाआघाडीत सामील करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे. मात्र काँग्रेसबरोबर युती करण्यावरून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० जागा देऊ असा प्रस्ताव ठेवला आहे. तर काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावत हे अत्यंत गंमतशीर असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ही युती फिसकटण्याची चर्चा सुरु आहे.

त्यातच आता काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तर वंचित आघाडी या आघाडीत सहभागी होणार नसल्याची अट वंचितने घातिली असल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा पक्ष समावेश होण्याची चिन्हं कठीण दिसत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लीम मतांची झालेली विभागणीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत पुन्हा पहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.