शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Atal Bihari Vajpayee : कविमनाचा माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:59 IST

मराठी साहित्यावर आणि कवितांवर त्यांचे विशेष प्रेम होते. १९८० ला झालेल्या गीतरामायणाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमालाही वाजपेयी उपस्थित होते. मराठी भाषेचे अफाट ज्ञान असलेल्या वाजपेयींनी रमणबागेत केलेल्या मुद्देसूद भाषणाने तेव्हा उपस्थित श्रोते पावसातही मंत्रमुग्ध झाले होते.

- श्रीधर फडके, संगीतकारगीतरामायण सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारोह १४ एप्रिल २००५ला पुण्याच्या रमणबागेत मोठ्या दिमाखात पार पडला. एप्रिल असूनही अचानक प्रचंड पाऊस पडत होता व हजारो पुणेकर रसिक त्या पावसात, चिखलात चक्क खुर्च्या उलट्या डोक्यावर धरून हा सोहळा अनुभवत होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, प्रमोद महाजन, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, बाबासाहेब पुरंदरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, बिंदूमाधव जोशी, माडगूळकर कुटुंबीय अशा विविध दिग्गजांच्या उपस्थितीत हा ४-५ दिवसांचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. पण या सोहळ्याचे आकर्षण होते अटलबिहारी वाजपेयी. बाबूजींचा आणि वाजपेयींचा खूप जुना परिचय. वाजपेयींचा व्यासंग इतका अफाट होता की त्यांना हिंदी साहित्याबरोबरच इतर भाषांतील साहित्याबाबत आपुलकी होती आणि चांगली जाणही होती. याला कारण होते त्यांचे अफाट वाचन आणि बुद्धिमत्ता. वाजपेयीजी खरेच एक हुशार व्यक्तिमत्त्व होते. मराठी साहित्यावर आणि कवितांवर त्यांचे विशेष प्रेम होते. १९८०ला झालेल्या गीतरामायणाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमालाही वाजपेयी उपस्थित होते. मराठी भाषेचे अफाट ज्ञान असलेल्या वाजपेयींनी रमणबागेत केलेल्या मुद्देसूद भाषणाने तेव्हा उपस्थित श्रोते पावसातही मंत्रमुग्ध झाले होते.मी खूप लहान असतानाचा एक किस्सा आठवतोय. बाबूजी आणि अटलबिहारी वाजपेयी हे दोघेही शब्दांवर, कवितेवर प्रेम करणारी माणसे होती. त्यामुळे पुढे आयुष्यभर दोघांचे ऋणानुबंध कायम टिकले ते याच कवितेमुळे, शब्दांमुळे. १९७२च्या सुमारास वाजपेयींचा बाबूजींना एक दिवस अचानक फोन आला. बाबूजी मी काही कामानिमित्त मुंबईत आलोय. माझी इथली सर्व कामे आटोपली आहेत. मला एक सुंदर मराठी सिनेमा पाहायचाय. तो तुम्ही मला दाखवाल का? वाजपेयींनी बाबूजींना एक दर्जेदार मराठी सिनेमा दाखवण्याची आपली इच्छा बोलून दाखवली होती. बाबूजींनीही वाजपेयींना उत्तर दिले. तुमची इच्छा पूर्ण करतो मी, पण तुम्ही पहिले माझ्या घरी जेवायला या. मस्त मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घ्या. मग आपण दोघेही सिनेमा पाहायला जाऊ. बाबूजींचे आमंत्रण वाजपेयींनी स्वीकारले आणि वाजपेयी बाबूजींच्या घरी दाखल झाले. मुंबईतील आमच्या अगदी छोटेखानी मात्र अतिशय सुंदर घरात वाजपेयींनी आपला बडेजाव घराच्या उंबरठ्यावरच बाहेर काढून ठेवला होता. अतिशय साधेसरळ व्यक्तिमत्त्व, डोळ्यांत तेज असणाऱ्या, अतिशय शुद्ध वाणीत हिंदीत बोलणाºया वाजपेयींना मी इतक्या जवळून पाहत होतो. आमच्या घरी वाजपेयींच्या जेवणाची जय्यत तयारी केली होती. मराठमोळ्या पद्धतीने अगदी पंगत वगैरे बसवून सुग्रास जेवणाचा बेत होता. या सुग्रास जेवणाचा आस्वाद वाजपेयींनी अगदी आवडीने घेतला. स्वच्छ शुभ्र धोतर, झब्ब्यात असणाºया वाजपेयींनी मराठमोळ्या पद्धतीने जमिनीवर मांडी घालून जेवणाचा आस्वाद घेतला होता. इतका साधा, सरळ माणूस मी पहिल्यांदाच पाहत होतो. जेवण झाल्यावर बाबूजी आणि वाजपेयी सिनेमा पाहण्यासाठी निघाले. दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचे बाबूजींनी नक्की केले. त्या वेळी प्लाझामध्ये निर्माते शरद पिळगावकरांचा (अभिनेते सचिन पिळगावकरांचे वडील) ‘अपराध’ सिनेमा चांगली गर्दी खेचत होता. हा सिनेमा पाहून वाजपेयींना खूप आनंद झाला. त्यानंतर १९८०ला गीतरामायणाचा रौप्यमहोत्सवी सोहळयालाही वाजपेयी आवर्जून उपस्थित होते. अशा कविमनाच्या जिंदादिल माणसाच्या सान्निध्यात वेळोवेळी राहण्याची संधी मिळाली हे भाग्यच.गीतरामायणाचे त्यांनी केलेले विवेचन हा त्यांच्या भाषणशैलीचा अतिउच्च नमुना होता हे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला जाणवले होते. शब्दांची केलेली गुंफण तसेच गीतरामायण लोकांना इतके का आवडते याची वाजपेयींनी त्यांच्या भाषणात केलेली मांडणी ही निव्वळ अप्रतिम होती.

(शब्दांकन - अजय परचुरे)

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीmarathiमराठी