शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकार, पती, सासूवरॲट्रॉसिटीचा गुन्हा; कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष, महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:47 IST

Crime News: अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा आरोप करत महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

मुंबई - अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिस चालढकल करत असल्याचा आरोप करत महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

अपर्णा नावाची ही महिला सध्या नवी मुंबईत राहते. ती पतीपासून विभक्त राहते. साडेतीन वर्षांपूर्वी अमेरिकास्थित अमीरअली हाजीयानी याच्याशी तिचा पुनर्विवाह झाला. पुण्यात निवडक नातेवाईक आणि परिचितांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा हाजीयानी कुटुंबाने मानसिक छळ सुरू केला.जातीय द्वेष आणि भेदभावालाही त्यांना सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे. 

 मागासवर्गीय म्हणून नांदवण्यास नकारअपर्णाची सासू आणि जावेने पोलिसांच्या चौकशीत ती मागासवर्गीय असल्याने नांदवण्यास नकार दिला, असे कबुल केले होते. तरीही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे अपर्णा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बोरिवली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने अपर्णा यांच्या मागणीवरून हा गुन्हा गोरेगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

पहिल्या पत्नीचाही केला होता छळहाजीयानीने त्याच्या पहिल्या पत्नीने अमेरिकेत दाखल केलेली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार अपर्णापासून लपवून ठेवली होती. गेले वर्षभर हाजीयानीने तिच्याशी संपर्क ठेवलेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गेल्यावर्षी ४ जुलैला बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार तसेच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रार  दाखल केली.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारChief Ministerमुख्यमंत्री