शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘भारतमाता की जय’वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

By admin | Published: April 04, 2016 3:11 AM

आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले.

मुंबई : आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.नाशिक येथील जाहीरसभेत शनिवारी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यानी टिष्ट्वटरच्या माध्यमातून खुलासा केला. ‘भारतमाता की जय’च्या वक्तव्यावरून माध्यमातील काही घटक विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या घोषणेचा आणि धर्माचा काही एक संबंध नाही. १७ मार्च रोजी माहीम येथील दर्ग्यात पाचशेहून अधिक मौलवींनी तिरंगा फडकाविला आणि भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या. हजरत मकदूम फतेह अली माहिमींच्या ६०३व्या उरूसात मान्यवर मौलवींनी केलेल्या या ध्वजारोहणाबद्दल अभिमान वाटतो आणि त्यांना आम्ही सलाम करतो, असेही आपण भाषणात म्हटले होते. मात्र हा सारा भाग माध्यमांनी वगळल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.‘भारतमाता की जय’ ही निव्वळ एखादी घोषणा नाही; हीच घोषणा देत लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्ययुद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही हजारो जवान याचा घोष करत स्वत:चे सर्वस्व देशासाठी अर्पण करतात, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोणी ‘जय हिंद’ म्हणो अथवा ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंदुस्थान’ म्हणो, कोणती घोषणा दिली जाते हा अजिबात वादाचा मुद्दा नाही. मात्र जर कोणी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नसेल, म्हणणार नाही अशी भूमिका घेत असेल तर त्याला माझा तीव्र आक्षेप आहे. लांगुलचालनालाही काही मर्यादा घालावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.‘भारतमाता की जय’ला विरोध करणाऱ्यांचा हेतू शुद्ध नाही. समाजात दुही माजवायची आहे, समाजात तेढ निर्माण करायची आहे, अशीच मंडळी घोषणेच्या नावाखाली वाद निर्माण करीत आहेत आणि कोणत्याही स्थितीत अशा लोकांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)