शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

अतिरिक्त पाणीवापराबाबत प्रयत्नशील

By admin | Published: April 17, 2016 2:03 AM

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे.

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्याची गरज भागवून उरलेल्या पाण्याचा वापर कसा करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे टाटा पॉवर कंपनीने कळविले आहे. ‘टाटांच्या सहा धरणातील पाणी दुष्काळी भागाला द्या,’ असे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर कंपनीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. टाटा पॉवर जलाशयातील पाणी विविध गरजांसाठी वापरले जाते. कात्रज, कोलाड, रोहा, मुळशी, पौड विभाग येथील सिंचन गरजा भागविण्यासाठी आणि पाताळगंगा, रासायनी, रोहा, बदलापूर या क्षेत्रातील औद्योगिक गरजा भागविण्यासाठी सहाही धरणांतील पाण्याचा उपयोग होतो. मुंबईला वीजपुरवठा करण्याच्या मुख्य उद्दीष्टासह इतर अनेक कामांसाठी या जलाशयांतील पाण्याचा वापर व्हायला लागला आहे. यंदा पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे गरज भागवून उरणारे पाण्याचा कसा योग्य वापर करता येईल यासाठी कंपनीचे अधिकारी पुणे तसेच रायगड जिल्ह्यातील सिंचन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समाजाच्या गरजा भागविण्यासाठी टाटा पॉवरने नेहमीच पुढाकार घेतला आहे. १९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर निर्माण झालेली भीषण परिस्थिती तसेच देशात विविध ठिकाणी आलेले पूर, चक्रीवादळ आदी आपत्तींच्या वेळी टाटा पॉवरने मदतीचा हात पुढे केला होता. दुष्काळी परिस्थितीविषयी आम्ही तितकेच संवेदनशील आहोत, असेही नमूद केले आहे. (प्रतिनिधी)