शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
4
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
5
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
6
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
7
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
8
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
9
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
10
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
11
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
12
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
13
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
14
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
15
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
16
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
17
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
18
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
19
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
20
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

‘राम मंदिर’ आंदोलनाच्या आडून संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 5:57 AM

संविधान बचाव रॅलीतील सूर : ‘मोदी हटाव देश बचाव’चा नारा

मुंबई : राम मंदिरापेक्षा रोटी, कपडा आणिं मकान महत्त्वाचे आहे. राम मंदिराचा मुद्दा पुढे करून सरकार आपले अपयश लपविण्याच्या प्रयत्न करत आहे. राम मंदिर आंदोलनाच्या आडून संविधानावरच घाला घालण्यात येत असून याविरोधात देशातील युवकांनी सज्ज राहावे, असे आवाहन संविधान बचाव रॅलीत सहभागी झालेल्या युवानेत्यांनी केले.

‘युनायटेड युथ फ्रंट’च्या माध्यमातून देशातील १४ प्रमुख राजकीय युवा संघटनांनी रविवारी संविधान पालखी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राहिलेल्या राजगृह ते चैत्यभूमीदरम्यान निघालेल्या या पालखीत कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. ‘हम सब एक है...इन्कलाब जिंदाबाद...लाठीकाठी खायेंगे संविधान बचायेंगे...मोदी हटाव देश बचाव, अशा घोषणा देत निघालेल्या या रॅलीचे चैत्यभूमीत सभेत रूपांतर झाले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करताना कन्हैया कुमार म्हणाले की, सरकारचे अपयश लपविण्यासाठी राम मंदिराचे आंदोलन पुढे केले जात आहे. राम मंदिर आंदोलनामुळे देशातील संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे घराघरात जाऊन संविधान धोक्यात असल्याचे सांगावे लागणार आहे. घराघरात ही माहिती पोहोचवून जातीवादी व मनुवादी सरकारला बाहेर फेकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले. या देशातील हिंदूही धोक्यात नाही आणि मुस्लीमही धोक्यात नाही. धोक्यात आहे ते संविधान, असेही कुमार यांनी सांगितले.

आता मंदिर आणि मशिदीची चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा भाजपा सरकार तुमच्याकडे हा विषय काढेल तेव्हा तुम्ही त्यांना रोजगाराचे आणि अच्छे दिनाचे प्रश्न विचारा. आज देशाचे संविधान धोक्यात आले असून सजग नागरिक म्हणून संविधान वाचवण्यासाठी एक व्हा, असे आवाहनही आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले. तर, देशाचे संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला लागली तरी त्यासाठी आपण तयार राहायला हवे, असे आवाहन पाटीदार समाजाचे युवानेते हार्दिक पटेल यांनी या वेळी केले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर