शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शहरानंतर आता संपूर्ण जिल्हा 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' म्हणून ओळखला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 19:51 IST

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे अधिकृतरित्या 'छत्रपती संभाजीनगर' जिल्हा आणि 'धाराशिव' जिल्हा करण्यात आले आहे.

Aurangabad and Osmanabad district Name change : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याची मागणी सुरू होती. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला, त्यानंतर केंद्रानेही या नामांत्तराला मंजुरी दिली. पण, नामांतर फक्त शहरांचे झाले की जिल्ह्याचे? असा प्रश्न निर्माण झाला होता. आता मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत राजपत्र (Gazette) जारी करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून ओळखला जाणार आहे.

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव नामकरणाला मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा करण्यात आले आहे. राज्य सरकारने राजपत्र नोटिफिकेशन जारी केले आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तालयाने नामांतर हरकती 27 मार्च पर्यंत मागवल्या आहेत आणि उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी देखील २७ मार्च रोजी आहे.

राज्य सरकारच्या नोटिफिकेशननुसार, आजपासून शहराप्रमाणेच या दोन्ही जिल्ह्यांची नावेही बदलण्यात आली आहेत. महसूल आणि वन विभागाकडून आज अधिकृत परिपत्रक काढण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 4 च्या पोट कलम (1) चे खंड सहा या अधिकाऱ्यांचा वापर करत जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे. 

नामांतराविरोधात याचिका

शहरांच्या नामांतराला विरोध असलेल्या याचिकांवर सोमवारी मुंबई खंडपीठात सुनावणी घेण्यात आली; मात्र तत्पूर्वीच केंद्र व राज्य शासनाने नामांतरांचे सूचनाप्रसिद्ध केलेले असल्याने आता याचिकाकर्त्यांना या सूचनापत्रांच्या विरोधात याचिका दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर २७ मार्च रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती धाराशिवचे याचिकाकर्ते खलील सय्यद यांनी दिली. धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतराला विरोध असणाऱ्या सुमारे ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUsmanabad S Pपोलीस अधीक्षक, उस्मानाबादMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार