शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा आज नव्याने निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 6:53 AM

बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते  बेकायदा होते - फडणवीस

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय अवैध असल्याचे सांगत आता शनिवारी (दि.१६) मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचे हे दोन्ही निर्णय नव्याने घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. नवी मुंबई विमानतळास ज्येष्ठ नेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही उद्या घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर अल्पमतातील सरकारने नामांतराचे निर्णय घेतले, ते  बेकायदा होते. ते उद्या न्यायालयात गेले तर टिकणार नाहीत. ही नामांतरे आमच्याही अस्मितेचाच भाग असल्याने आमचे पूर्ण बहुमतातील सरकार योग्य प्रक्रियेने हा निर्णय घेईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमदार अब्दुल सत्तार यांनी रवींद्र नाट्यगृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात शुक्रवारी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिंदे यांनी टीका केली की, अडीच वर्षे सरकारने या नामांतराबाबत कोणतेही निर्णय घेतले नाहीत अन् जाताजाता अवैधरीत्या निर्णय घेतले. 

फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेल्या सरकारने घेतलेले निर्णय बेकायदा ठरतात आणि न्यायालयांचे आधीचे अशा प्रकरणांबाबत निकालही आहेत. आता सुधारित प्रस्ताव तयार करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना सांगितले आहे. आमचे पूर्ण बहुमत असलेले सरकार हा निर्णय घेईल. 

...तर कायमचे राजकारण सोडेन आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकही आमदार पडला तर आपण राजकारण सोडू. आपण शिवसेनेच्या हितासाठी उठावाची जी भूमिका घेतली ती लोकांनी स्वीकारली आहे. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद