शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

औरंगाबाद ‘पॅटर्न’ने दिली नवी दिशा

By admin | Published: September 21, 2015 12:57 AM

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांनी देशातील पहिले ‘आयएसओ’ मानांकन पटकावण्याचा मान मिळविल्यानंतर आता तब्बल २५० ग्रामपंचायतींची वाटचालदेखील ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्याच्या दिशेने सुरू आहे.

विजय सरवदे, औरंगाबादऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांनी देशातील पहिले ‘आयएसओ’ मानांकन पटकावण्याचा मान मिळविल्यानंतर आता तब्बल २५० ग्रामपंचायतींची वाटचालदेखील ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्याच्या दिशेने सुरू आहे. त्यादृष्टीने राबविलेला औरंगाबाद ‘पॅटर्न’ दिशादर्शक ठरत आहे.तत्कालीन विभागीय आयुक्त संजय जैस्वाल, तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या कार्यकाळात वेरूळ - खुलताबाद रोडवरील अब्दीमंडी या ३ हजार लोकवस्तीच्या गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार मिळविल्यानंतर गावातील तीन अंगणवाड्यांनी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले. अंगणवाड्यांना मानांकन मिळविणारे देशातील हे पहिलेच गाव.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीही ‘आयएसओ’ झाल्या पाहिजेत, असा विचार जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या मनात आला. ५ सप्टेंबर २०१४ रोजी बीडीओ, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि सरपंचांची कार्यशाळा घेऊन त्यात यासंबंधीचा संकल्प करण्यात आला. जिल्ह्यात ८६१ ग्रामपंचायती आहेत. यापैकी आजघडीला २५४ ग्रामपंचायती ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रस्तावित असून, यातील ५४ ग्रामपंचायतींच्या यासंबंधीच्या तपासण्याही झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी ‘डीपीडीसी’समोर निधीचा प्रस्ताव ठेवला. जिल्हाधिकाऱ्यांनीही तब्बल १२ कोटींचा निधी मंजूर केला. ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी वाटप केला. जिल्ह्यातील २५४पैकी १०० ते १५० ग्रामपंचायतींच्या इमारतींकडे पाहिले तर ‘कॉर्पोरेट’ कार्यालयासारखा त्यांचा लूक दिसतो.ग्रामपंचायतींच्या अद्ययावत इमारतींबरोबरच गरोदर महिलांसाठी ‘माहेरघर’, कार्यालयासमोर वृक्ष लागवड, गावात खेळाचे मैदान, स्वच्छ पाण्याचा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रंथालय, व्यायामशाळा, सार्वजनिक शौचालये, स्मशानभूमींचा विकास, अंगणवाड्या - शाळांमध्ये हात धुण्यासाठी वॉश बेसीन, संगणक आदींची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायतींना गेल्या वर्षी १८ कोटी रुपयांचे कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी तब्बल ९१ टक्के वसुली झाली. कर वसुलीतही त्या ग्रामपंचायती राज्यात अव्वल ठरल्या.