शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं; कॅबिनेटमध्ये शिवसेना मंत्र्यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 7:03 PM

शिवसेनेने ही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्यामुळे हिंदुत्वासाठी आम्हीच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होतोय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी दबाव आणला आहे. या सर्व घडामोडीत राज्यातील सरकार अल्पमतात आले आहे. बंडखोर आमदार गुवाहाटीला आहे मात्र दुसरीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. 

राज्य सरकारच्या या कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव आणला आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घ्यावा असं परब यांनी सांगितले. अनिल परब म्हणाले की, वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना मुंबईत भूखंड द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला आहे. राजकीय विषय कॅबिनेट बैठकीत होत नाहीत. कॅबिनेटमध्ये राज्य सरकारची धोरणांवर चर्चा होते.औरंगाबाद शहराचं नामांतरण संभाजीनगर करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणावा. उद्या यावर निर्णय होऊ शकेल. 

शिवसेनेने ही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्यामुळे हिंदुत्वासाठी आम्हीच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होतोय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको, भाजपासोबत युती करा अशी मागणी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांने अशाप्रकारे मागणी करून औरंगाबादचं नामांतर करण्याच्या विषयाला हात घातला आहे. 

औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिलं होतं. 

टॅग्स :Anil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद