शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

ऊसतोड मजुरांची वणवण कायम

By admin | Published: April 16, 2016 2:26 AM

निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आष्टी तालुक्यातील मजुरांवर पुन्हा स्थलांतराची वेळ आली आहे. ऊसतोडीसाठी गेलेले कडा परिसरातील मजूर गावी

- नितीन कांबळे, आष्टी (जि.बीड)

निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आष्टी तालुक्यातील मजुरांवर पुन्हा स्थलांतराची वेळ आली आहे. ऊसतोडीसाठी गेलेले कडा परिसरातील मजूर गावी आल्यानंतर आठ दिवस होत नाही तोच काहीही काम न मिळाल्याने त्यांना अहमदनगर येथे जाऊन काम शोधण्याची वेळ आली आहे. कारखान्याच्या गळीत हंगामात तालुक्यातून ६० हजार मजुरांचे स्थलांतर झाले होते. हंगाम पूर्ण झाल्याने १५ दिवसांपासून हे मजूर गावी परतू लागले आहेत. गावी परतूनही मजुरीचा प्रश्न कायम आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मजुरांना अहमदनगरमधील एमआयडीसी तसेच व्यापाऱ्यांकडे काम करण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय स्तरावरील कामे प्रक्रियेत रखडली आहेत. तालुक्यात एम.आर.जी. एस अंतर्गत २२५ कामे सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत; मात्र मजुरांची संख्या पाहता कामांची संख्या अत्यल्प आहे. आष्टी तालुक्यात १२१ ग्रामपंचायती असून, तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाच्ंया घरात आहे. तब्बल सहा महिने ऊसतोडणीसाठी परराज्यात गेलेले मजूर परतले खरे, मात्र पुन्हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर पुन्हा भटकंतीची वेळ आल्याचे नवनाथ झांजे यांनी सांगितले. तालुक्यात मजुरांची संख्या वाढली असून त्या तुलनेत कामांची संख्या मात्र अपुरी आहे. अधिकारी मात्र यंत्राद्वारेच कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत.दिवस उजाडताच आमच्या गावातून १०० ते १२५ मजूर नगरला जातात. गावात हताश होऊन बसण्यापेक्षा हाताला मिळेल ते काम आम्ही करीत आहोत. मजुरांची संख्या वाढल्याने दोनशे पन्नास रुपयांचा रोजगार २०० रुपयांवर आला आहे. - साहेबराव गरूड, मजूर, कडा (बीड)कारखान्यावर गेल्यावर कामाची तरी शाश्वती असते; मात्र गावात येऊन पुन्हा तोच प्रश्न समोर येत आहे. उपासमार काय असते हे आम्ही अनुभवायला लागलो आहोत. प्रशासनाने कामांसंदर्भात ठोस पावले उचलावीत, अन्यथा जगणे मुश्किल होणार आहे. - चंद्रकला कांबळे,महिला कामगार, घाटापिंप्रीतालुक्यातील विविध गावात २२५ कामे एम.आर.ए.जी.एस.अंतर्गत सुरू झाली आहेत. त्यावर २,९०० मजूर काम करीत आहेत. तसेच एप्रिल महिन्याच्या अखेरीस इतर ठिकाणीही कामे सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला आहे. - रामेश्वर गोरे, तहसीलदार