शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

जागावाटपावरून होणार दमछाक

By admin | Published: July 27, 2014 2:14 AM

शिवसेना-भाजपा युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात असले, तरी भाजपा आणि शिवसेना एकमेकांसाठी जागा सोडण्यापूर्वी मित्रपक्षांना सन्मानाने जागावाटप करतील,

यदु जोशी - मुंबई 
शिवसेना-भाजपा युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात असले, तरी भाजपा आणि शिवसेना एकमेकांसाठी जागा सोडण्यापूर्वी मित्रपक्षांना सन्मानाने जागावाटप करतील, असे समन्वय समिती बैठकीनंतर नेत्यांनी जाहीर केले असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांनी वेळोवेळी केलेल्या मागण्या लक्षात घेता,  या चार पक्षांना मिळून किमान 9क् जागा हव्या आहेत. त्यामुळे मित्रपक्षांचे समाधान करताना भाजपा-सेनेची कसरत होणार आहे. 
लोकसभा निवडणुकीपूर्वी रामदास आठवले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रय} झाला असला, तरी मंत्रिपद मिळावे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. त्यामुळे दोघांपैकी नेमके कोणाला मंत्रिपद द्यायचे, असा पेच भाजपासमोर आहे. निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावून जागांचे वाटप झाले पाहिजे, असा भाजपा नेत्यांचा आग्रह आहे. त्याचा मोठा फटका लहान मित्रपक्षांना बसू शकतो. या निकषानुसार रिपब्लिकन पार्टीला तीन ते चारच जागा मिळू शकतील, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फक्त आठ ते दहा जागा मिळतील. बारामतीतून लढत दिलेले महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची स्थिती वेगळी नाही. शिवसंग्रामची पाटी अजून कोरीच आहे. दरम्यान, भाजपाला जागा वाढवून हव्या आहेत. त्यासाठी शिवसेनेशी संघर्ष होणो अटळ आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी भाजपाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रणनीती आखल्याचे सूत्रंनी सांगितले. 
 
कोल्हापूर : लोकसभेतील यश केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळाल्याचा कांगावा काही जण करतात. मग ही लाट कोल्हापूरसह कर्नाटक, केरळमध्ये का दिसली नाही, अशी विचारणा करत सन्मानाने जागावाटप झाले तर ठीक अन्यथा ‘स्वाभिमानी’चा ङोंडा घेऊन विधानसभा लढवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.