शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

आव्हाडांच्या विधानाचे अयोध्येत पडसाद; रामजन्मभूमीतील महंतांचे थेट भाष्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 1:42 PM

Jitendra Awhad News: श्रीरामांबाबत केलेल्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

Jitendra Awhad News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद उमटत आहेत. भाजपासह अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलने केली. तसेच जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यातच आता अयोध्या नगरीतून जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया आली आहे. 

राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. राम ज्यावेळी वनवासाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कंदमुळे आणि फळ खाल्ली हेच शास्त्रामध्ये लिहिले आहे. शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे, असे आचार्य सत्तेंद्र दास यांनी म्हटले आहे. तसेच महंत सुधार दास यांनीही यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली आहे. 

भक्तिमय वातावरणात राक्षसांचा जीव गुदमरतो

शरद पवार यांच्यासमवेत त्यांच्या व्यासपीठावर वारंवार हिंदू देवतांचे अपमान केले जातात. मागे जयंत पाटील यांनीही अशा प्रकारचे विधान केले होते. असे प्रकार शरद पवार यांच्याकडून ठरवून केले जात आहेत का, जाणीवपूर्वक हिंदू धर्मावर बोलले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचाच एक भाग म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी असे विधान केले. याविरोधात पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहोत, असे महंत सुधीर दास यांनी सांगितले. राम मंदिराच्या निमित्ताने संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे. या भक्तिमय वातावरणात राक्षसांचा जीव गुदमरतो. त्याचाच परिणाम म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा जीव गुदमरू लागला आणि असे विधान केले. श्रीरामांनी पंचवटीत १४ हजार राक्षस मारले होते. त्यातीलच काही यांच्यासारखे परत जन्माला आले असे वाटते, या शब्दांत जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांनी या विधानाबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यावेळी काही पुरावे दाखवत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाड