शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Ayodhya Result : पोलिसांच्या पुढाकारानंतर हिंदु-मुस्लीम बांधवांनी घालून दिला आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 16:09 IST

अयोध्या निकाल : तेरखेडा येथील गावकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत आदर्श घालून देण्याचे काम केले आहे.

- मोसीन शेख 

मुंबई : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमळा पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालाचे स्वागत म्हणून तेरखेडा गावातील हिंदू-मुस्लीम समाजातील बांधवांनी गावात चक्क गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.

अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. हिंदू आणि मुस्लीम बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याला सर्वत्र प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.

दरम्यान तेरखेडा येथील गावकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत आदर्श घालून देण्याचे काम केले आहे. येरमळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडीत सोनवणे आणि तेरखेडा गावातील बिभीषण खामकर यांच्या पुढाकाराने अयोध्या प्रकरणाच्या कालाचे स्वागत म्हणून तेरखेडा गावातील हिंदू-मुस्लीम समाजातील लोकांनी गावात गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला. विशेष म्हणजे गावातील सर्वच समाजातील लोकांनी यात सहभाग घेत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले.

एक हजारपेक्षा अधिक गावकऱ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. न्यायालयाचा निकाल काही असला तरीही तो आपल्याला मान्य असून, नेहमीप्रमाणे गावातील लोकं एकजूटीने सोबत राहतील. असे सुद्धा यावेळी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या गावाने एक वेगळा आदर्श राज्यासमोर ठेवला असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस अधीक्षक राज तिलक यांच्या मार्गदर्शनाखाली व तेरखेडा येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले होते. त्याला गावकऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद देऊन सर्वांपुढे एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला. - पंडीत सोनवणे (सहायक पोलीस निरीक्षक)

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUsmanabad policeउस्मानाबाद पोलीस