शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

लातुरात बहुजन क्रांती मोर्चा

By admin | Published: January 10, 2017 5:25 PM

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा संयुक्त बहुजन क्रांती मोर्चा मंगळवारी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 10 - लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा संयुक्त बहुजन क्रांती मोर्चा मंगळवारी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दुपारी ३.३० वाजता बहुजन क्रांती मोर्चाचा समारोप जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर झाला.
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली. अशोक हॉटेल, शिवाजी चौक आणि जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध मागण्यांचे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चात कार्यकर्त्यांकडून हाती फलक घेऊन विविध घोषणा देण्यात आल्या. अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, अ‍ॅट्रॉसिटीसाठी स्वतंत्र न्यायालय आणि स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, जे लोक एससी, एसटीमधील लोकांचा गैरवापर करून अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करीत आहेत, अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. भटके विमुक्त जाती-जमातीसाठी स्वतंत्र केंद्रीय अनुसूची करण्यात यावी, त्यांनाही अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार संरक्षण देण्यात यावे, त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्राच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजालाही ओबीसीचे आरक्षण कायम ठेवून आरक्षण देण्यात यावे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदा कडक करण्यात यावा आदींसह विविध मागण्या या बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. मोर्चा दुपारी २.३० वाजता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चात विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी आपले विचार मांडले. मोर्चात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
कॅशलेसपेक्षा देश ‘कास्ट’लेस करा... 
केंद्रातील सरकारने कुठलीही उपाययोजना न करता नोटाबंदीचा निर्णय घेत देश कॅशलेस करण्याची योजना आखली आहे. कॅशलेसपेक्षा प्रथम देश ‘कास्ट’लेस केला पाहिजे. त्याशिवाय बहुजन समाजाचा विकास होणार नाही. केंद्र आणि राज्यातील सरकार हे बहुजनांच्या विरोधातील आहे. सरकारचे डावपेच वेळीच ओळखा आणि ते हाणून पाडा, असेही आवाहन मोर्चातील पदाधिका-यांनी बोलताना केले. 
 
विविधरंगी झेंड्यांनी वेधले लक्ष... 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चात वेगवेगळ्या मागण्यांचे फलक आणि विविध रंगी झेंड्यांनी लक्ष वेधून घेतले. ‘ए आझादी झुटी है, देश की जनता भुखी है’, ‘आमचे हक्क मिळालेच पाहिजेत’, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत’, ‘भूमिहिनांना शासकीय जमिनी वाटप करण्यात याव्यात,’ आदी मागण्याही यावेळी मोर्चेक-यांनी केल्या.