शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

बजाज आॅटोत आता पाच दिवसांचा आठवडा

By admin | Published: May 12, 2016 4:28 AM

मराठवाड्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूजच्या बजाज आॅटोला दुष्काळाचा फटका बसला आहे. या कारखान्यात पाच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूजच्या बजाज आॅटोला दुष्काळाचा फटका बसला आहे. या कारखान्यात पाच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला आहे. रविवारच्या साप्ताहिक सुटीसह आता शनिवारीही कारखाना बंद ठेवला जाणार आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे संपूर्ण मराठवाडा पाणीटंचाईच्या संकटाशी सामना करीत आहे. औरंगाबाद व जालन्यातील उद्योगांना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा केव्हाच संपला असून, मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा केला जात आहे. बजाज आॅटोने पाणीबचतीसाठी यापूर्वीच विविध उपाययोजना केल्या आहेत; परंतु सर्वात कठोर निर्णय घेताना आता एक दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या कमर्शियल व्हेईकल प्लँटमध्ये दैनंदिन उत्पादनात वाढ करून आठवड्याचे कामकाज सहाऐवजी पाच दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, याचा उत्पादनावर कसलाही परिणाम होणार नसल्याचे बजाज आॅटोचे उपाध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) डी. एन. नार्वेकर यांनी सांगितले.