शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

बालभारती, वन्स मोअर अन् भिंग भिंग भिंगरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 12:38 IST

मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

दुर्गेश सोनार, सहायक संपादक

मोरोपंतांच्या मोबाइलवर सक्काळी सक्काळी व्हॉट्सॲपचं नोटिफिकेशन आलं. त्यांनी डोळे चोळत चोळतच मोबाइल हातात घेतला आणि काय आलंय ते पाहिलं... त्यांचे डोळे विस्फारले... पहिलीच्या पाठ्यपुस्तकातली बालकविता कोणत्या तरी ग्रुपवर कुणी तरी धाडली होती. मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

‘जंगलातली मैफिल’ कवितेतून मांडत असताना त्या कवयित्रीने केलेली शब्दांची ओढाताण पाहून मोरोपंतांचा रसभंग झाला. त्यांना जुन्या बालभारतीतल्या कविता आठवू लागल्या... खरंच, पूर्वीच्या (जुन्या काळातल्या) कविता अशा उथळ नव्हत्या. एकप्रकारचं नादमाधुर्य, लालित्य, कल्पनारम्यता, सहजता त्या जुन्या कवितांमध्ये होती. बालमनाला ‘भावे’ल अशा त्या कविता होत्या. पावसाची सर जशी झरझर यावी, तसे त्या कवितांमधले शब्द झरझर येत असत. त्यामुळेच तर त्या कवितांना पिढ्यान् पिढ्या ‘वन्स मोअर’ मिळत गेला आणि आजही त्या कविता इतक्या लख्ख लक्षात राहिल्या.  

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो... अहाहा... ग. ह. पाटलांची काय ती कविता होती... बालभारतीतल्या अशा एकेक कविता मोरोपंतांना आठवू लागल्या. त्यांचं मनातल्या मनात चिंतन सुरू झालं... 

इतकं सुंदर खरं तर लिहिता आलं पाहिजे. पण छोट्या मुलांच्या भावविश्वाला आपलंसं वाटेल असं सोप्पं, सहज लिहिणं हेच खरं म्हणजे अवघड असतं. तरी, ‘ट ला ट, र ला र... म्हणे मी कविता करणार...’ अशी यमके कवी काहीच्या काही लिहून कवितेला उथळ करून टाकतात. अशा सुमार कवितांमुळे मुलांमध्ये साहित्याबद्दल आवड तरी कशी निर्माण होणार? आधीच मुलं कवितांपासून, पुस्तकांपासून दूर हरवत चालली आहेत मोबाइलच्या दुनियेमध्ये... त्यांच्यासमोर आभासी मायाजाल तंत्रज्ञानाने पसरवलेलं आहे. त्यात मुलं अडकू नयेत, यासाठी उत्तम दर्जाचं बालसाहित्य त्यांच्यासमोर यायला हवं... मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देईल, त्यांची सौंदर्यदृष्टी वाढवेल, त्यांचा भाषिक विकास करेल, अशा बालसाहित्याची गरज आहे. पण दुर्दैवाने सध्याच्या घडीला ही एक मोठी पोकळी मराठी बालसाहित्यात जाणवत आहे.

मोरोपंतांना ही सल प्रकर्षाने जाणवू लागली. त्यांना साने गुरूजींची आठवण झाली. ते म्हणाले होते, ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे...’  पण असे रंजनातून शिक्षण देणारे शिक्षक तरी आता कुठे राहिलेत शाळाशाळांमध्ये...? काही अपवाद नक्कीच असतील, पण तितकं पुरेसं नाही. बिनभिंतीच्या शाळेत बरंच काही शिकता येतं. पण त्याचं भान ना पालकांना ना इथल्या शिक्षण व्यवस्थेला... त्रिकोणी कुटुंबांमध्ये गोष्टी सांगणारे आजी-आजोबा घरात नाहीत, मग सांस्कृतिक संचिताचं बाळकडू मुलांना मिळणार तरी कसं?  असे एक ना अनेक प्रश्न पहिलीतल्या त्या एका बालकवितेने मोरोपंतांसमोर उभे ठाकले. बालभारतीतल्याच जुन्या कवितेतील भिंगरीप्रमाणे मोरोपंतांभोवती या प्रश्नांची भिंग भिंग भिंगरी फिरू लागली... आणि ते कमला पवार यांची ती कविता गुणगुणू लागले...

‘एक होती भिंगरी, भिंग भिंग भिंगरीतिचं नाव झिंगरी, झिंग झिंग झिंगरी तिला आहे एक पायपायावरती गिरकी खाय सारखी सारखी फिरते गोलफिरता फिरता जातो तोलगिरकी खाऊन आली चक्करभिंतीवरती मारली टक्कर’  

टॅग्स :Educationशिक्षण