शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

बालभारती, वन्स मोअर अन् भिंग भिंग भिंगरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 12:38 PM

मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

दुर्गेश सोनार, सहायक संपादक

मोरोपंतांच्या मोबाइलवर सक्काळी सक्काळी व्हॉट्सॲपचं नोटिफिकेशन आलं. त्यांनी डोळे चोळत चोळतच मोबाइल हातात घेतला आणि काय आलंय ते पाहिलं... त्यांचे डोळे विस्फारले... पहिलीच्या पाठ्यपुस्तकातली बालकविता कोणत्या तरी ग्रुपवर कुणी तरी धाडली होती. मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

‘जंगलातली मैफिल’ कवितेतून मांडत असताना त्या कवयित्रीने केलेली शब्दांची ओढाताण पाहून मोरोपंतांचा रसभंग झाला. त्यांना जुन्या बालभारतीतल्या कविता आठवू लागल्या... खरंच, पूर्वीच्या (जुन्या काळातल्या) कविता अशा उथळ नव्हत्या. एकप्रकारचं नादमाधुर्य, लालित्य, कल्पनारम्यता, सहजता त्या जुन्या कवितांमध्ये होती. बालमनाला ‘भावे’ल अशा त्या कविता होत्या. पावसाची सर जशी झरझर यावी, तसे त्या कवितांमधले शब्द झरझर येत असत. त्यामुळेच तर त्या कवितांना पिढ्यान् पिढ्या ‘वन्स मोअर’ मिळत गेला आणि आजही त्या कविता इतक्या लख्ख लक्षात राहिल्या.  

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो... अहाहा... ग. ह. पाटलांची काय ती कविता होती... बालभारतीतल्या अशा एकेक कविता मोरोपंतांना आठवू लागल्या. त्यांचं मनातल्या मनात चिंतन सुरू झालं... 

इतकं सुंदर खरं तर लिहिता आलं पाहिजे. पण छोट्या मुलांच्या भावविश्वाला आपलंसं वाटेल असं सोप्पं, सहज लिहिणं हेच खरं म्हणजे अवघड असतं. तरी, ‘ट ला ट, र ला र... म्हणे मी कविता करणार...’ अशी यमके कवी काहीच्या काही लिहून कवितेला उथळ करून टाकतात. अशा सुमार कवितांमुळे मुलांमध्ये साहित्याबद्दल आवड तरी कशी निर्माण होणार? आधीच मुलं कवितांपासून, पुस्तकांपासून दूर हरवत चालली आहेत मोबाइलच्या दुनियेमध्ये... त्यांच्यासमोर आभासी मायाजाल तंत्रज्ञानाने पसरवलेलं आहे. त्यात मुलं अडकू नयेत, यासाठी उत्तम दर्जाचं बालसाहित्य त्यांच्यासमोर यायला हवं... मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देईल, त्यांची सौंदर्यदृष्टी वाढवेल, त्यांचा भाषिक विकास करेल, अशा बालसाहित्याची गरज आहे. पण दुर्दैवाने सध्याच्या घडीला ही एक मोठी पोकळी मराठी बालसाहित्यात जाणवत आहे.

मोरोपंतांना ही सल प्रकर्षाने जाणवू लागली. त्यांना साने गुरूजींची आठवण झाली. ते म्हणाले होते, ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे...’  पण असे रंजनातून शिक्षण देणारे शिक्षक तरी आता कुठे राहिलेत शाळाशाळांमध्ये...? काही अपवाद नक्कीच असतील, पण तितकं पुरेसं नाही. बिनभिंतीच्या शाळेत बरंच काही शिकता येतं. पण त्याचं भान ना पालकांना ना इथल्या शिक्षण व्यवस्थेला... त्रिकोणी कुटुंबांमध्ये गोष्टी सांगणारे आजी-आजोबा घरात नाहीत, मग सांस्कृतिक संचिताचं बाळकडू मुलांना मिळणार तरी कसं?  असे एक ना अनेक प्रश्न पहिलीतल्या त्या एका बालकवितेने मोरोपंतांसमोर उभे ठाकले. बालभारतीतल्याच जुन्या कवितेतील भिंगरीप्रमाणे मोरोपंतांभोवती या प्रश्नांची भिंग भिंग भिंगरी फिरू लागली... आणि ते कमला पवार यांची ती कविता गुणगुणू लागले...

‘एक होती भिंगरी, भिंग भिंग भिंगरीतिचं नाव झिंगरी, झिंग झिंग झिंगरी तिला आहे एक पायपायावरती गिरकी खाय सारखी सारखी फिरते गोलफिरता फिरता जातो तोलगिरकी खाऊन आली चक्करभिंतीवरती मारली टक्कर’  

टॅग्स :Educationशिक्षण