शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
3
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
4
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
5
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
6
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
7
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
8
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
9
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
10
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
11
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
12
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
13
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
14
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
15
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
16
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
18
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
19
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
20
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक

सुट्टीनंतर बँका आज उघडणार, 4 वेगवेगळ्या लागणार रांगा

By admin | Published: November 15, 2016 8:59 AM

सोमवारच्या एक दिवसाच्या सुट्टीनंतर देशभरातील बँका आज पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी उघडणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 - सोमवारच्या एक दिवसाच्या सुट्टीनंतर देशभरातील बँका आज पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी उघडणार आहे. गुरू नानक यांच्या जयंतीमुळे सोमवारी देशभरातील बँक कर्मचा-यांना सुट्टी होती. बँका बंद असल्यामुळे एटीएमबाहेर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सुट्टीचा संपूर्ण दिवस एटीएमबाहेर रांगा लावण्यात गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नोटबंदीच्या निर्णयामुळे गेल्या चार दिवसांपासून बँका तसेच एटीएमबाहेर नोट बदलण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 
 
एक दिवसाच्या सुट्टीनंतर बँका उघडणार असल्याने मुंबईसह देशभरात नागरिकांनी पहाटेपासूनच बँका तसेच एटीएमबाहरे रांगा लावल्या आहेत. काही तर चक्क रात्रीपासूनच एटीएम, बँकाबाहेर बसून आहेत. दरम्यान, नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी पाहता बँक कर्मचा-यांनी चार वेगवेगळ्या रांगा करण्याचा निर्णय घेतला आहे. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्धांसाठी अशा चार रांगा बँकाबाहेर लावण्यात येणार आहेत. 
 
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नोटांच्या कमतरतेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून तात्पुरता काही होईना, पण नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोणत्याही एटीएममधून पैसे काढल्यास त्यावर चार्ज लागणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 
बँक, एटीएममधील निर्बंध शिथील 
दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून 4000 रुपये काढण्याचे निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसाला 4,000 रुपयांऐवजी 4,500 रुपये काढता येऊ शकतात.  तसेच एटीएममधूनदेखील 2,000 रुपयांऐवजी 2,500 रुपयांची रक्कम काढता येणार आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने बँकांना आदेश दिले असून, आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. 
 
 
एसटी महामंडळाचा शेतक-यांना दिलासा
नोटांच्या कमतरतेमुळे एसटी महामंडळाने शेतक-यांना विनाशुल्क भाजीपाला एसटीमधून नेण्यास मंजुरी दिली आहे. 50 किलोपर्यंत भाजीपाला शेतक-यांनी एसटीतून विनाशुल्क नेता येणार आहे.  
 
(भाजीपाल्याची एसटीतून विनाशुल्क वाहतूक)
 
सर्व विमानतळावरील पार्किंग मोफत
तसेच,देशभरातील सर्व विमानतळांवर 21 नोव्हेंबरपर्यंत पार्किंग मोफत करण्यात आली आहे. यामुळे थोड्या प्रमाणात का होईन पण सर्वसामान्यांना दिलासा मिळला आहे.