शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

बारामतीचा पारा ४० अंश सेल्सिअसवरच

By admin | Published: April 27, 2016 1:19 AM

शहरात ४० अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्धांना या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

बारामती : शहरात ४० अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्धांना या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. तर घराबाहेर फिरणाऱ्या पुरुष, महिला टोपी, गाँगल, रूपाल, स्कार्फ चा वापर करीत आहे. त्यामुळे बाजारात या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले. दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सक्तीची संचारबंदी असल्याचे चित्र उन्हामुळे दिसत आहे. यंदा उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांची थंड पेय, रसवंती गृहात गर्दी दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी शहरातील ज्युससेंटर, आॅइस्क्रम पार्लर, ऊसाच्या रसाचे ठेले, पाणी पाऊच आदींसाठी दुकानांमध्ये गर्दी आहे. त्याचप्रमाणे उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, रूमा, गॉगल्स, सनकोट, स्कार्प आदींची खरेदी होत आहे. मात्र, दुपारच्या वेळी ग्राहक कोणत्याही प्रकारच्या खरेदीला बाहेर पडत नाहीत, असे चित्र आहे. लग्नासराईदेखील जोरात सुरू असल्याने मिरवणूकीच्या निमित्ताने याची विक्रमी विक्री होतांना दिसून येत आहे. तसेच लग्नाकार्या निमित्ताने पाणी विक्रेत्यांकडून जारमधील पाणी देखील मोठया प्रमाणात मागविले जात आहे. तसेच मॅगो ज्युस, पायनपल ज्युस, मोसंबी ज्युस आदींची दुकाने मोठया प्रमाणात लागली आहे. काही संस्थाकडून शहरात ठिकठिकाणी पाणपोयी उघडण्यात आल्या आहेत. तसेच घरांवर उन्हापासून बचाव करण्यासाठी टाकण्यात येणारे हिरवे कापड, देखील मोठया प्रमाणात खरेदी केले जात आहे. शहरात तापमान मोठ्याप्रमाणात वाढले आहे. उन्हाच्या काहीलीपासून बचाव करण्यासाठी कुलर, एअर कन्डीशनला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे येथील दुकानदार संतोष मुथा यांनी सांगितले. मागील १५ दिवसांपासून बारामतीचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वरच आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी तर सक्तीची संचारबंदी असल्याचे रस्त्यावर पहाण्यास मिळते. बाजारपेठेत देखील आर्थिक उलाढाल मंदावली आहे. (प्रतिनिधी)